Popular Posts

Saturday, July 7, 2012

आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।


टीप । आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरची प्राचीन महिती सांगणारा लेख
------------------------------------
दशरथ यादव, (संत साहित्याचे अभ्यासक)
पुणे. संपर्क ९८८१०९८४८१
                       आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।।
........................
भागवत धर्माचे धर्मपीठ असलेल्या पंढरपूरच्या महतीविषयी अनेक संतानी वेगळे महत्व विशद केले आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन चंद्रभागानदीत स्नान करायचे व लाडक्या विठूरायाचे दशर्शन झाले की, वारकरी धन्य होतात. ही शेकडो वर्षाची परंपरा अजूनही अखंडपणे सुरू आहे. वारकरी संप्रदायाची काशी असलेले तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर होय. आषाढी कातिकी विसरु नका मज। सांगतसे गुज पांडुरंग।। वारकरी संप्रदायाची ही अत्यंत महत्वाची यात्रा मानली जाते. आषाढी यात्रेपासून ते कार्तिकी यात्रेपयर्यंतचा चार महिन्याचा काळ चातुर्मास म्हणून संबोधला जातो. याकाळात लाखो वारकरी पंढरपुरात मठ, मंदिरे, धर्मशाळेत राहून भजन, कीर्तन व प्रवचनाच्या कार्यक्रमात सहभागी होतात. भागवत धमार्माचा अभ्यास करतात. आषाढीयात्रेसाठी दरवर्षी संताच्या पालख्यासमवेत सुमारे ८ ते १० लाख भाविक पंढरीत येत असतात. ही परंपरा गेली शेकडो वर्षे सुरू आहे. तथागत गौतम बुद्धांची मानवताधर्माची मोडीत निघालेली चळवळ पुन्हा वारकरी संप्रदायाच्या रुपाने सुरु झाली. देशात व महाराष्ट्रात बुद्ध लेण्यांच्या रुपाने जागोजागी मानवतेचा विचार पेरला आहे. त्याचा प्रभाव हजारो वर्षे जनमानसांवर आहे. मधल्या कालखंडात वैदिक परंपरेने बौद्ध तत्वज्ञान संपल्याचा गाजावाजा सुरु केला होता. पण वेगवेगळ्या चळवळीच्या निमित्ताने बुद्धांचा विचार समाजात नसानसात भिनला होता. ही मानवतेची चळवळ पुढे वारकरी संप्रदायातील संतानी हातात घेऊन चालवली व पुढे नेल्याचे इतिहासाचे संशोधन करणार्यांनी मान्य केले आहे. भारतरत्न डा. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्म स्वीकारेपयर्यंत हा विचार व तत्वज्ञान वारकरी पंथ, महानुभाव पंथ, शीख पंथ या चळवळीच्या रुपाने समाजात रुजवला जात होता. विचार कधी मरत नसतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे तो समाजात प्रतीत होत असतो. पण तोपर्यंत सदृश स्वरुपात तो जाणवत नाही. मात्र माणसांच्या आंतरमनावर त्याचा ठसा उमटलेला असतो. वारकरी संप्रदायाच्या प्राचीनत्नवाचा विचार करता ही नाळ क्षेत्रिय गौतम व बळीवंशाची आहे, हेच स्पष्ट होते.
 पंढरीच्या राया। माझी विनवणी पायी।
काय वर्णू हरिच्या गोष्टी। अनंत ब्रम्हांडे याचे पोटी।
सेना न्हावी याचे घरी। अखंड राबे विठ्ठल हरी।।
राम चिंता ध्यानी मनी। म्हणे नामायाची जनी।।

संत नामदेव महाराजांची समकालीन असलेली संत जनाबाईने पंढरीचे महात्म्य सांगणारे अनेक अंभग लिहिले आहेत. ज्या काळात सनातनी प्रवृतीच्या वैदिक परंपरेने समाज वेठीला धरला होता. त्याकाळात याच वारकरी संप्रदायाने विठ्ठल नामाचा महिमा गात पंढरीचे महत्व वाढवून वारकरी पंथ जगात नेला. संत नामदेव तर म्हणतात आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।। स्वगार्गात वैकुंठ पाहत बसणाऱ्या समाजाला नामदेवांनी वैकुंठ म्हणून पंढरीच आहे, असे सांगून जागृती केली. पंढरीचा महिमा संतानी वर्णन करताना जराही दुलर्लक्ष केले नाही.जेवढी बुद्दी व विद्ववत्ता वापरून वणर्णन करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न केला. यामागचे कारण एकच की, समाजात सनातनी प्रवृतीला व हिंदू धर्मातील गलिच्छ रुढीला विटलेल्यांना हा सन्मार्ग मिळाला.
पंढरीचा वारकरी। त्याचे पाय माझ्या शिरी।.।
हो का उत्तम चांडाळ। पायी ठेवीन कपाळ।.
वंद्य होय हरिहरा। सिद्ध मुनि ऋषेश्वरा।.
मुखी नाम गर्जे वाणी।  म्हणे नामायाची जनी।।
किंवा
संतभार पंढरीत। कीतर्तनाचा गजर होत
तेथे असे देव उभा। जैशी समचरणाची शोभा।।
रंग भरे किर्तनात। प्रेमे हरिदास नाचत।
सखा विरळा ज्ञानेश्वर । नामायाचे जो जिव्हार।।
ऐशा संता शरण जावे। जनी म्हणे त्याला ध्यावे।।
पंढरपूरच्या प्राचीन परंपरेविषयी संताच्या अंभगातून अनेक गोष्टी उलगडतात. दिंड्या पताका वैष्णव नाचती। पंढरीचा महिमा वणार्णावा किती।। या संत नामदेवांच्या अंभगानुसार माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी।। या भावनेने लाखो वारकरी, खांद्यावर वारकरी संप्रदायाची पताका घेऊन मुखाने हरिनाम म्हणत टाळ मृदंगाच्या गजरात पायीवारीने येतात. काही जण भारतभरातून या वैभवी सोहळ्यासाठी येतात.
प्राचीन पंडरगे (पंढरपूर)
-----------------------
पंढरपूरचे महत्व कीती आहे, हे संतानी जाणीवपूवर्वक समाजाला सांगून पंढरीची ही पायवाटच आपल्या जन्माचे साथर्क करील हे सांगितले. त्यामागे वारकरी चळवळ वाढून समाजात समता प्रस्थापित व्हावी हाच उदात्त हेतू संताचा होता. जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।। हे अंभगाचे चरणच पंढरीचा प्राचीन इतिहास उलगडण्यास पुरेसे आहे.
प्रसिद्द संशोधक रा.चि.ढेरे यांनी संशोधन करून पंढरपूरच्या तीथर्थक्षेत्राचा इतिहास उलगडला आहे. पांडुरंगाचे विठ्ठल हे पयायार्यी नाम असले तरी पांडुरंग विठ्ठल हे. ‘’काशी विश्वनाथ’’ यासारखे नाव होते. स्कांद, पांडूरंगमाहात्म्यातही असाच उल्लेख आहे. काशीविश्वनाथ म्हणजे काशीक्षेत्राचा विश्वनाथ असा होतो. हैदराबादमधील  तिरू मैल पर्वतावर वेंकटेशचे मंदिर उभारले आहे. मात्र तेथील भक्ततांनी तिरूमैल व्यंकटेश असे नामकरण केले आहे. 
पंढरपूर या क्षेत्राचे मूळ कन्नड नाव पंढरगे. विठ्ठल मंदिरातील सोळखांबी मंडपातील तुळईवर असलेल्या होयसळ नृपती सोमेश्वराच्या लेखात (११५९) या ग्रामनामाचा उल्लेख आहे. या ‘पंडरगे’ पासून पांडुरंग हे देवनाम आले. पंढरपूर हे क्षेत्रनाम व पुंडरीक हे कृत्रिम संस्कृतीकरण करून साधले. विठ्ठल नामाची स्पष्टीकरण सांगण्याच्या हेतूने तो विटेवर उभा असल्याचे सांगितले आहे. लोकप्रिय प्रचलित सामग्रीतूनच माहात्म्यकथा रचली जाते. असा दैवतशास्त्रज्ञांना कायम प्रत्यय आला आहे. विठ्ठलाची विकसन प्रक्रिया याच पद्धतीन घडत राहिली.
विठ्ठलाचे आदिरुप मात्र अद्यापही आपल्या दृष्टीक्षेपात येऊ शकले नाही. त्या नामाचा शोध घेण्यासाठी विठ्ठल नामाची निशःक व्युत्पती सापडायला हवी. विठ्ठल-विरप्पा या नावाने नांदणारी धनगरांची विठ्ठलोपसना शोधल्यास काही गोष्टींचा उलगडा होईल. विठ्ठल ह गवळी-धनगरांचा देव आहे.पदूबाई नावाच्या गवळणबाईचा पती आहे. ही वस्तूस्थिती ध्यानी घ्यावी लागेल. नग्ना व मुक्तकेशी होऊन विठ्ठलावर भाळलेली पद्मा पांडुरंगमाहत्म्यात आहे.
विठ्ठल व  वेंकटेश हे दोघेही विष्णूरुप आहेत. बालाजी (बालकृष्ण) मानले. या सर्व साम्यांचा शोधासाठी वापर करायाला हवा. कृष्णरुप मानला गेलेला कटीवर कर ठेवून उभा असलेला पश्चिम बिहारमधील अहिरांचा देव वीर कुवर (वीर कुमार) याचा विठ्ठलाशी साम्यबंध लक्षणीय ठरेल.    
श्रीक्षेत्र पंढरपूर
चंद्रभागा नदीच्या तीरावर वसलेले पंढरपूर हे सर्वात श्रेष्ठ असे तीर्थस्थान आहे. 'जेव्हा नव्हते चराचर।| तेव्हा होते पंढऱपूर|।।' असे संत नामदेव सांगून गेले आहेत. पंढऱपूर हे क्षेत्र पंढरी, पांडुरंगपूर, पंढरीपुर, फागनीपुर, पौंडरिक क्षेत्र, पंडरंगे आणि पांडुरंगपल्ली अशा विविध नावांनी त्या त्या कालखंडात परिचित होते. काहींच्या मते पंढरपूर हे भागवत व महाभारतकालाच्याही आधीपासून अस्तित्वात होते. कारण भागा नदी ( चंद्रभागा) चा उल्लेख श्रीमद्भागवत व महाभारत या ग्रंथातही आढळतो. पंढरपूर पूर्वी दिंडिरवन या नावानेही ओळखले जात असे. येथील जंगलात दिंडीख या राक्षसाचे वास्तव्य होते. त्याचा वध मल्लिकार्जुनाने केला. पुढे शालिवाहन राजवटीमध्ये या जंगलाची साफसफाई करण्यात आली आणि तीन योजन अंतरामध्ये एक विस्तीर्ण वस्ती बसविण्यात आली. राजाने लाखभर रुपये खर्च करुन मल्लिकार्जुनाचे देऊळ तसेच पांडुरंगाचे देऊळ बांधले आणि पंढरीनाथाची वास्तू उभी करुन या नगरीला 'पांडुरंग नगरी' असे नाव दिले. (संदर्भ : मालूतार ग्रंथ)
इ.स. ५१६ मधील एक शिलालेखामध्ये पंढरपूरचा उल्लेख पांडुरंगपल्ली असा आढळतो. केरळमधील कालंटी येथे इ.स. ७३२ ते ७८८ चा कालावधीत होऊन गेलेल्या श्रीआद्य शंकराचार्य यांनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या श्रीपांडुरंगाष्टकम् या अष्टश्लोकी काव्यात भीमानदीच्या तीरावर उभ्या असलेल्या पांडुरंगाची मी उपासना करतो असे म्हटले आहे.
सोळखांबी शिलालेखात इ.स. १२२६ मध्ये भीमरथी नदीचे काठी पंडरंगे नावाचे महाग्राम वसले आहे, असा उल्लेख आहे. तसेच १२७० साली झालेल्या एका शिलालेखात पंढऱपूरचा उल्लेख पांडुरंगपूर असा आहे. १२६० ते १३०९ या यादवकाळातील हेमाद्री (हेमाडपंत) या मंत्र्याने आपल्या चतुर्वर्ग चिंतामणी ग्रंथात पंढऱपूर व पांडुरंगाचे वर्णन केले आहे. तर १३०३ सालच्या चौंडरस या कवीच्या अभिनव दसकुमारचरित या ग्रंथातच पंढरी व विठ्ठलराय असा उल्लेख आहे.
१४९० ते १५०८ या काळात निजामशाहीतील दलपतिराज या मंत्र्याने लिहिलेल्या नृसिंहप्रसाद ग्रंथातील तीर्थसार भागातील कथेनुसार सांगायचे तर यात पुंडरीकक्षेत्री भीमेच्या दक्षिण तीरावर पांडुरंग राहत असल्याचा उल्लेख आहे. येथे पुंडरीक नावाचा माणूस पुष्करिणीच्या तीरावर आश्रम बांधून राहात होता. पुंडरीकाने हे क्षेत्र माझ्या नावाने 'पुडरीक क्षेत्र' म्हणून प्रसिद्ध व्हावे असा वर कृष्णाला मागितला. त्याच विनंती मान्य करुन भगवंताने त्याला मी येथे गुप्त रुपाने वास करीन असे आश्वासन दिले. पुरातन काळापासून या क्षेत्राला वेगळे महत्व आहे.
श्री द्वारिकाधीश मंदिर – श्रीमंत शिंदे सरकार वाडा येथे महाद्वार घाटावरच भव्य दगडी तटबंदी असलेले श्री द्वारकाधीशाचे मंदिर आहे. हे मंदिर बाहेरुन किल्ल्यासारखे दिसते.  मंदिराला चार भव्य दरवाजे असून, देवळात चारही बाजूला प्रशस्त ओवर्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर जय-विजयाच्या मूर्ती आहेत. मुख्य मंदिरातील मुरलीधराची शाळीग्रामची मूर्ती देखणी आहे. मुतीर्ती चतुर्भुज असून, मस्तकी चांदीचा मुकूट आहे. या मंदिरात गोकुळ अष्टमीस तीन दिवस मोठा उत्सव असतो. या मंदिराचे बांधकाम 1249 साली करण्यात आले. ग्वाल्हेरचे महाराज दौलतराव शिंदे यांच्या पत्नी महाराणी बायजाबाई महाराज राणीसाहेब यांनी हे मंदिर बांधले, याच मंदिरात श्रीराधिका, श्रीरुक्मिणी, श्रीगणपती व गरुड तसेच बाइजाबाईसाहेब महाराज यांच्या मूर्ती आहेत
ताकपिठे विठोबा मंदिर : श्रीविठ्ठल मंदिराच्या मागील पश्चिमद्वार रस्त्याला, चौफाळयाकडून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला, मंदिरापासून फक्त 250 ते 300 फूट अंतरावर ताकपीठे विठोबा प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे. पुढे सभामंडप आहे. मुख्य व्यासपीठावर श्रीविठ्ठलाची मूर्ती आहे. हे मंदिर सन 1618 साली रमाबाई नावाच्या एका ब्राम्हण महिलेने बांधले असा ऐतिहासिक पुरावा आहे. ती श्रीविठ्ठलभक्त होती. रोज 'श्री'ना ताक व पीठ एकत्र करुन नैवेद्य दाखवीत असे. स्वत: श्री विठ्ठलनाथ तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन ताकपीठ खाण्यासाठी येत असत, अशी एक कथा आहे. या मंदिरातील मूर्तीत व मुख्य मंदिरातील मूर्तीत साम्य आहे.
गोपालकृष्ण मंदिर : एस् टी स्टँडकडून मंदिराकडे जाताना चौफाळा भाग लागतो. याच चौफाळयात दगडी बांधकामाचे इंद्रापूरच्या नारायण नाखरे नावाच्या व्यक्तीने 1770 साली बांधलेले गोपालकृष्ण मंदिर आहे. हे मंदिर श्रीविट्ठल मंदिराच्या पश्चिमेस आहे. यात्राकाळात नगर प्रदक्षिणेला जाणाऱ्या सर्व दिंडया, पालख्या इथे थांबवितात, अभंग म्हणतात. या ठिकाणाहून श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. या मंदिरावर शिखर आहे. मंदिरातील श्रीगोपाळकृष्णाची मूर्ती अतिशय सुंदर, मनमोहक आहे.
काळा मारुती मंदिर : प्रदक्षिणा मार्गावर विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस काळामारुतीचे भक्कम दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. गर्भागार व 4 खांबांवर आधारलेला सभामंडप असे या मंदिराचे दोन भाग आहेत. सन. 1799 साली रामचंद्र नावाच्या एका ब्राह्मणाने हे मंदिर बांधले व 1960 साली मुंबईच्या एका गुजराती वैष्णवाने सभामंडप बांधला असा संदर्भ सापडतो. हनुमानजयंतीला येथे मोठा उत्सव होतो. या मंदिराचे संदर्भात असे सांगतात की संत भानुदासाने अनागोंदीहून भक्तिबळावर आणलेली विठ्ठलमूर्ती वारकऱ्यांनी वाजतगाजत मंदिरात नेली व मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून काळया मारुतीची स्थापना केली गेली. इथे थांबून विजयाचा अभंग गातात.
नामदेव मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर विणेगल्लीजवळ कासार घाटाशेजारी नामदेव मंदिर आहे. केशवराज संस्थेने या मंदिराचा जीर्णोध्दार केला आहे. या मंदिराची जागा पूर्वी नामदेव टेकडी म्हणून प्रसिध्द होती. याच जागेत विठुरायाचे लाडके भक्त संत नामदेवांचे वास्तव्य होते. याच जागेवर भव्य व अतिशय सुंदर असे मंदिर बांधले असून मंदिरात संतश्रेष्ठ श्रीनामदेव व श्रीकेशीराज (श्रीविठ्ठल) यांच्या अत्यंत मनमोहक मूर्ती आहेत. संत जनाबाईचीही छोटी मूर्ती या मंदिरात आहे. या मंदिरात संत नामदेवाच्या 16 व्या पिढीतील वंशज राहतात. मंदिरात नामदेवरायांची हस्तलिखित गाथा आहे.
श्रीधर स्वामी समाधी मंदिर : कुंभार घाटावर हे समाधिमंदिर आहे. 250 वर्षांपूर्वी होऊन गेलेले श्रीधर स्वामी नाझरेकर महान भक्त व श्रेष्ठ कवी होते. त्यांनी शिवलीलामृत, रामविजय, हरिविजय, पांडवप्रताप, अंबिका उदय इ. प्रासादिक ग्रंथांची रचना केली.
श्रीज्ञानेश्वर मंदिर व श्रीनाथ मंदिर : प्रदक्षिणेच्या मार्गावर नाथ चौकात ही दोन संतांची मंदिरे आहेत. आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने या मंदिराच जीर्णोध्दार करण्यात आला आहे. मंदिरावर मंदिरावर सुंदर शिखर बांधले आहे. या मंदिरात श्रीज्ञानेश्वर माऊलींच्या पितळी मुखवटा आहे. आषाढी यात्रेत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पालखी इथेच असते. इथून जवळ श्रीनाथ मंदिर आहे. एकनाथ षष्ठीला इथे उत्सव होतो. याशिवाय पंढरपुरात अनेक मंदिरे आहेत. त्यांपैकी रामबागेत श्रीरामाचे मारवाडी समाजाचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर अंबाबाई पटांगणाजवल, श्रीव्यास-नारायणाचे मंदिरासमोर आहे. येथे प्रतिवर्षी रामजन्मोत्सव मोठया थाटामाटाने संपन्न केला जातो.सावरकर पथावर दाक्षिणात्य पध्दतीचे आकर्षक प्रवेशद्वार असणारे लक्ष्मणबाग नावाचे श्रीलक्ष्मी-व्यंकटेशाचे मंदिर आहे. 

No comments: