Popular Posts

Friday, December 28, 2012


कृषीतंत्रज्ञान, वास्तव जीवन
साहित्यात येण्याची गरज

संमेलनाध्यक्ष दशरथ यादव यांचे प्रतिपादन


बारामती, ता. २८ ः  कृषीसंस्कतीमधील वास्तव जीवन व तंत्रज्ञानावर आधारित शेतीचे महत्व साहित्यात आले तरच कृषीसाहित्य आणि शेतकरी जगाच्या बाजारात आपले स्थान निर्माण करू शकेल. असे प्रतिपादन राज्यस्तरीय पहिल्या लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने बारामती येथे लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. उल्लेखनीय काम करण्या व्यक्तींचा पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. शाहीर रमेश खाडे यांच्या पोवाड्याने कायर्क्रमाची सुरवात झाली. यावेळी ग्रामीण कथाकार बबन पोतदार, ज्येष्ठ साहित्यिक संभाजीराव मोहिते, बारामतीच्या नगराध्यक्षा जयश्रीताई सातव, चित्रपट निर्माते नाना थोरात, परिषदेचे राष्ट्रीय कायार्याध्यक्ष शरद गोरे, उपाध्यक्ष राजकुमार काळभोर, जिल्हाध्यक्ष बी.डी गायकवाड, मराठा विभागाचे अध्यक्ष अॅड अविनाश आवटे, उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष सतीश मडके आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटोआेळी बारामती ः लोकनेत शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन.
श्री यादव म्हणाले, मातृसत्ताक व कृषीसंस्कृतीशी नाळ जोडलेल्या या देशातील समाजाचे वास्तव चित्रण आजपर्यंतच्या साहित्यात हवे तेवढे उतरले नाही. कथा व कल्पनात लेखक साहित्यिक रमल्याने कृषीसाहित्य परिपूर्ण झाले नाही. पुरोगामी चळवळीचा वारसा असणारे, ग्रामीण,शहरी साहित्याने वैचारिक मंथन करण्याचे काम केले. मात्र कृषीसाहित्य त्यांच्यापासून दूर राहिले. कथा,कल्पना,नाट्य मनोरंजनात्म साहित्य लिहिणा-यांकडून वास्तव लेखन झाले नाही. हरितक्रांतीच्या पाच कलमी कायर्यक्रमाने शेती, सहकार, आधुनिक तंत्रज्ञानाच वापर वाढला. शेतीत अमूलाग्र बदल झाला त्याचा वेद  साहित्यात घेतला गेला नाही. अजूनही जुन्याच पद्धतीचे ग्रामीण जीवन साहित्या मांडणारे, लेखक,कवी यांनी वास्तव समाजजीवन साहित्यातून जपावे. 
 प्राचीनकाळी नदीच्या काठावर मातीत बियाण्याची पेरणी करणारी पहिला महिला निरुतीच्या नावाने नवरात्र उत्सव साजरा केला जातो, असे सांगून श्री यादव पुढे म्हणाले, शेतीशास्त्रा मूळ गाभाच समाज विसरून गेला आहे. नसर्गाच्या लहरीपणाला कवेत घेत शेतीत सोन पिकवणा-या शेतक-यांच्या जगण्याला साहित्यात कीती स्थान मिळते.  याचा विचार करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात साहित्य लेखन करणारी चांगली पिढी निमार्ण होते हे आशादायी चित्र आहे. ग्रामीण, दलित, भटक्या, प्रबोधन करणा-या साहित्य चळवळी पुढे येत आहेत. लोकांना प्रेरणा देणारे, जगण्यात आनंद निमार्ण करणारे साहित्यच समाजाला पुढे नेवू शकते.
यावेळी सौ. जयश्रीताई सातव, प्रा. पोतदार, प्रा. जाधव यांनी मनोगत व्यक्तत केले. प्रास्ताविक शरद गोरे यांनी केले. स्वागत बी.डी.गायकवाड यांनी केले. विजया साळुंखे यांनी आभार मानले.


चौकट
ज्येष्ठ साहित्यिक मा. दा. देवकाते यांच्या कतृत्वाचे स्मरण म्हणून बारामतीत दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने मा. देवकाते मराठी साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. त्यांची सरकार दरबारी व महामंडळाकडून कायम उपेक्षाच करण्यात आली.

फोटोआेळी बारामती ः लोकनेत शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन.
krushi samelan 1.JPGkrushi samelan 1.JPG
3473K   View   Share   Download  

Tuesday, December 18, 2012

शंभुराजे


                     


Monday, December 10, 2012

क-हाकाठावरचे महात्मा फुले साहित्य संमेलन



क-हाकाठावरचे
महात्मा फुले साहित्य संमेलन
-----------------------------


पुरंदर ही शूर, वीर, समाजसुधारकांची भूमी. छ.संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवरायांची स्वराज्याची पहिली लढाई बेलसर येथे झाली. महाराष्टाचे कुलदैवत मल्हारी मातर्तंड खंडोबा, प्राचीन यादवकालीन भुलेश्वर, नारायणेश्वर, पांडेश्वर, संत सोपानदेवांची समाधी, असा एतिहासिक परंपरेचा वारसा अंगाखांद्यावर मिरवणार्या या क-हापठारावर आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक, शाहीर सगनभाऊ, आचार्य अतरे, अशी मंडळी होऊन गेली. याच मातीचा वारसा घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी मानवतेची चळवळ सुरु करून छ. शिवाजीमहाराजांवर पहिला कुळवाडीभूषण हा पोवाडा लिहिला.

जेजुरीचा भंडारा लावुनिया कपाळा
येथुनिया मराठा जिंकावया निघाला...

किंवा

अल्याड क-हा अन पल्याड निरा
हा शिवशाहीचा झरा रं...
शिवशंभुचा पुरंदर म्हणजे
मोतियाचा तुरा रं...
 या कवी दशरथ यादव यांच्या गीतातून पुरंदरचे वर्णन केले आहे.

एतिहासिक वारसा लाभलेल्या या भूमित पहिली महारांची परिषद झाली. स्वराज्याचे पहिले सरसेनापती बाजी पासलकर यांची समाधी सासवडला आहे. याच मातीने शिवशाही नंतर पेशव्यांना सांथ दिली. पानिपतात क-हाकाठावरील ५२ सरदार होते..पिलाजीराव जाधवरावांचा इतिहास याच मातीतला..
येथूनच महात्मा फुले यांची सामाजिक चळवळ पुढे गेली.
विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली |
नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले!

हे सांगणारे महात्मा फुले यांच्या मूळगावी संमेलनाची सुरवात झाल्याने, राज्यातून लेखक व साहित्यिक आवडीने येतात. खानवडी आता भारताच्या नकाशावर झळकू लागले आहे.. समाजसुधारक म्हणून त्यांनी केलेल्या कामाला उतराई होण्याचा हा प्रयत्न आहे..सत्यशोधक चळवळीचा विचार या निमित्ताने पुढे गेला तरच मानवता व समानता या म्हणन्याला अर्थ येईल. याच भावनेतून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन २००८ साली सुरु केले आहे. महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश,छ्त्तीसगड, बेळगाव, कोकण, बिदर अशा ३५० शाखा व बारा हजार सभासद आहेत. या परिषदेच्यावतीने नवोदित साहित्यांके नेतृत्व केले जाते. नुकतेच १९ अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन सोलापूरला झाले. याशिवाय चार राज्यस्तरीय संमेलने परिषदेच्या वतीने घेतली जातात.    खानवडीत यंदा झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे उद्धघाटन महाराष्ट्र राज्य कृषी शि‍क्शन व संशोधन परिषदेचे उपाध्यक्श विजय कोलते यांच्या हस्ते झाले. कोकाटे सर संमेलनाध्यक्श होते. यावेळी माजी मंतरी बाळासाहेब शिवरकर, दादा जाधवराव, सुदामराव इंगळे, स्वागताध्यक्स पुणे महापालिकेचे नगरसेवक बंडुतात्य गायकवाड होते.
परिषदेच्यावतीने राज्यात विविध भागात काम करणा-या मान्वरांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
समारोपावेळी झालेल्या कविसंमेलनाला मोठी गदी होती. उस्मानाबाद, बारामती, नगर, रत्नागिरी, सोलापूर, मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, गोवा, कोल्हापूर येथून साहित्यिक आले होते. कविसंमेलनात सतीश मडके, योगेश मारके, परभणीचे संतोष नारायणकर, सोलापूरचे गोरख् भांगे, महेंद्र गायकवाड, सोमनाथ सुतार, जगदीप वनशीव, सागर शिंदे, गिरीश भांडवलकर, वषार्षा पवार, सोनाली यादव, अलका बनकर, पदमजा म्हस्के, सुवर्णा बनसोडे, विजया सांळुखे, हनुमंत चांदगुडे, ज्ञानेश चिंते,शेखर गीरी, परमेश्वर पालकर, दत्ता साकोळे यांनीही कविता सादर केल्या. दशरथ यादव यांनी सूतरसंचलन केले..
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने गेली पाच वर्षापासून महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले यांच्या मूळगावी खानवडी (ता.पुरंदर) येथे दरवषी २८ नोंव्हेबर रोजी होते. २००८ साली संमेलनाध्य्‍क्श साहित्यमातर्तंड यशवंतराव सावंत, उदघाटन प्राचार्य शिवाजीराव भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल वाघ होते. या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, कथाकथन, परिसंवाद, कविसंमेलन, समारोप असे उपक्रम होत असतात. समाजात समता प्रस्थापित करण्यासाठी त्याकाळात मध्ये समाजात बंड करणारे महात्मा फुले यांच्या नावाने हे राज्यातील पहिले साहित्य संमेलन साहित्य परिषदेने सुरु केले. मुळचे पुरंदरचे असलेले व बातमीदारी व साहित्यात गेली वीस वषे काम करणारे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय विश्वस्त दशरथ यादव यांच्या पुढाकाराने हे संमेलन सुरु झाले.त्यांच्या बरोबर परिषदेचे कार्याध्यक्श शरद गोरे, उपाध्यक्श राजकुमार काळभोर, यात सहभागी होते. पुणे जिल्हाध्यक्श बी.डी.गायकवाड, कार्याध्यक्श राजाभाऊ जगताप, तालुकाध्यक्श प्रा. केशव काकडे, सुनील लोणकर, नंदू दिवसे, सुनील धिवार, फुले, हे सहभागी असतात. यापूवी इतिहासाचार्य प्रा. मा.म.देशमुख, प्रा रतनलाल सोनग्रा, प्रा. गंगाधर बनबरे, ग्रामीण कथाकार बबन पोतदार, इतिहास संशोधक प्रा. ऋईमंत कोकाटे, यांनी संमेलनाचे अध्यक्श म्हणून पद भूषविले आहे.
--------------------------------------

Sunday, December 9, 2012

सह्याद्रीच्या सुता

सह्याद्रीच्या सुता

बारामती ग्राम। जन्मला शरद।
विकासाला छेद। हिमालय।।१।।
वारसा तुकाचा। फ़डकवी झेंडा
मोडोनिया बंडा। अन्यायाच्या
दिलीश्वर झुके। मराठीचा बाणा
शिवराय राणा। आपोआप

बहुजन मं‌‌तर। आळविला त्यांनी।।
सगळा धावला। वारकरी ।।१।।
तुकाराम नामा फुले आणि बाबा।।
छ्‌पती शाहू । अभ्यासला।।२।।
आधुनिक तं‌ । शेतीत भरलं।।
धन वाढविलं । खळ्यामाजी।।३।।

विळखा शेतीला । कर्जाचा बसला।।
अस्वस्थ झाला। भूमिपूतर ।।१।।
करी कर्ज माफ । सोडविता फास।।
कुणब्याचा कस। जागवला।।२।।
पिकवले धान्य। अडवून पाणी।।
फुल्यांची वाणी । शिवरात।।३।।

साखळी तोडून। केलं स्‌ईला मुक्त।।
आर्‌क्सन दिलं। घरोघरी ।।१।।
कुणबी काबाड । फासात अडला।।
तिढा सोडवला। सावकारीचा।।२।।
कतृर्तत्वाने सा-या। दिशा उजळल्या।।
ज्योती पाजळल्या। प्रतिगामी।।३।।


शरदाचे भाळी। पसरे चांदणे।।
शेतीचे अंगण। गोंदियेले ।।१।।
शिवाजी शंभूचे। वारस हो तुम्ही।।
मराठ्याचा धर्म। जागविला।।२।।
जाणता हो राजा। आपण झालात।।
कतृत्व जगात। दाखवूनी।।३।।

सह्याद्रीचा सिंह। शेती शिक्शा तं‌तर।।
अवकाशी मंतर। जागवला ।।१।।
जगामाजी नेला। माझा महाराष्ट्र।।
पुरोगामी राष्ट्र। घडविले।।२।।
फुले शाहू बाबा । वाकविती नभा।।
विचारांचा गाभा। जपियेला।।३।।

शारदा मातेचा। पूतर पराक्रमी।।
विकासाची हमी। जनतेला ।।१।।
सत्य शोधकाचे। जुनेच घराणे।।
म्हणून धिराने । बोलतसे।।२।।
काटेवाडी गाव। कुणाला ना ठावे।।
भले भले राव। भेटलेना।।३।।


हिमालय बोले। सह्याद्रीशी गुज।।
व्हाना तुम्ही राजं। भारताचं ।।१।।
नभ पेलण्याची । ताकद तुमची।।
उगीच आमची। परीकशा।।२।।
सह्यद्रीच्या सुता। तुला दंडवत।।
राजाराम पुत। बोलियेला।।३।।


मुख्यमंतरी झाले। शरद पवार।।
किती हो सत्कार। गावोगावी ।।१।।
यशवंतराव । गुरुशिष्य जोडी।।
उभी केली गुडी। विकासाची ।।२।।
शिवाचा वारस। शोभती साहेब।।
फुकाचा गजब। सनातनी ।।३।।

संगणक ज्ञान। शेती करा छान।।
जपी मनोमन । सहकार।।१।।
ऐंशी टक्के जपा। समाजकारण।।
करा राजकारण। उरलेले ।।२।।
वेळ आणि शिस्त पाळायची हमी
घेतली ना तुम्ही आम्हाकडे।।३।।

क्रिकेट कबड्डी। कुस्तीत आभाळी।।
जगाला भुपाळी। शिकवली।।१।।
भाषण तुमचे । आम्हा मिळे ज्ञान।।
होती कीती जन। सज्ञान।।२।।
पोलिसांचा वेष । बदलला तुम्ही।।
जना दिली हमी। संरकशन।।३।।


तरुणांनी यावे। उद्योजक व्हावे।।
जनलोका द्यावे। समाधान।।१।।
काय सांगू तुम्हा। सागाराची खोली।।
मोजता न आली। कुणालाही।।२।।
हिमालय पडे । फिका तुम्हा पुढे।।
राशीवर राशी। कतृत्वाच्या।।३।।


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१
                 


                                                                                  सह्याद्रीच्या सुता

बारामती ग्राम। जन्मला शरद।
विकासाला छेद। हिमालय।।१।।
वारसा तुकाचा। फ़डकवी झेंडा
मोडोनिया बंडा। अन्यायाच्या
दिलीश्वर झुके। मराठीचा बाणा
शिवराय राणा। आपोआप

बहुजन मं‌‌तर। आळविला त्यांनी।।
सगळा धावला। वारकरी ।।१।।
तुकाराम नामा फुले आणि बाबा।।
छ्‌पती शाहू । अभ्यासला।।२।।
आधुनिक तं‌ । शेतीत भरलं।।
धन वाढविलं । खळ्यामाजी।।३।।

विळखा शेतीला । कर्जाचा बसला।।
अस्वस्थ झाला। भूमिपूतर ।।१।।
करी कर्ज माफ । सोडविता फास।।
कुणब्याचा कस। जागवला।।२।।
पिकवले धान्य। अडवून पाणी।।
फुल्यांची वाणी । शिवरात।।३।।

साखळी तोडून। केलं स्‌ईला मुक्त।।
आर्‌क्सन दिलं। घरोघरी ।।१।।
कुणबी काबाड । फासात अडला।।
तिढा सोडवला। सावकारीचा।।२।।
कतृर्तत्वाने सा-या। दिशा उजळल्या।।
ज्योती पाजळल्या। प्रतिगामी।।३।।


शरदाचे भाळी। पसरे चांदणे।।
शेतीचे अंगण। गोंदियेले ।।१।।
शिवाजी शंभूचे। वारस हो तुम्ही।।
मराठ्याचा धर्म। जागविला।।२।।
जाणता हो राजा। आपण झालात।।
कतृत्व जगात। दाखवूनी।।३।।

सह्याद्रीचा सिंह। शेती शिक्शा तं‌तर।।
अवकाशी मंतर। जागवला ।।१।।
जगामाजी नेला। माझा महाराष्ट्र।।
पुरोगामी राष्ट्र। घडविले।।२।।
फुले शाहू बाबा । वाकविती नभा।।
विचारांचा गाभा। जपियेला।।३।।

शारदा मातेचा। पूतर पराक्रमी।।
विकासाची हमी। जनतेला ।।१।।
सत्य शोधकाचे। जुनेच घराणे।।
म्हणून धिराने । बोलतसे।।२।।
काटेवाडी गाव। कुणाला ना ठावे।।
भले भले राव। भेटलेना।।३।।


हिमालय बोले। सह्याद्रीशी गुज।।
व्हाना तुम्ही राजं। भारताचं ।।१।।
नभ पेलण्याची । ताकद तुमची।।
उगीच आमची। परीकशा।।२।।
सह्यद्रीच्या सुता। तुला दंडवत।।
राजाराम पुत। बोलियेला।।३।।


मुख्यमंतरी झाले। शरद पवार।।
किती हो सत्कार। गावोगावी ।।१।।
यशवंतराव । गुरुशिष्य जोडी।।
उभी केली गुडी। विकासाची ।।२।।
शिवाचा वारस। शोभती साहेब।।
फुकाचा गजब। सनातनी ।।३।।

संगणक ज्ञान। शेती करा छान।।
जपी मनोमन । सहकार।।१।।
ऐंशी टक्के जपा। समाजकारण।।
करा राजकारण। उरलेले ।।२।।
वेळ आणि शिस्त पाळायची हमी
घेतली ना तुम्ही आम्हाकडे।।३।।

क्रिकेट कबड्डी। कुस्तीत आभाळी।।
जगाला भुपाळी। शिकवली।।१।।
भाषण तुमचे । आम्हा मिळे ज्ञान।।
होती कीती जन। सज्ञान।।२।।
पोलिसांचा वेष । बदलला तुम्ही।।
जना दिली हमी। संरकशन।।३।।


तरुणांनी यावे। उद्योजक व्हावे।।
जनलोका द्यावे। समाधान।।१।।
काय सांगू तुम्हा। सागाराची खोली।।
मोजता न आली। कुणालाही।।२।।
हिमालय पडे । फिका तुम्हा पुढे।।
राशीवर राशी। कतृत्वाच्या।।३।।


दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१