Popular Posts

Monday, December 30, 2013

संमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार

संमेलनस्थळाला सोपानदेव नाव देणार
साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी राजे यांचे नाव
दशरथ यादव यांची माहिती
सासवड़, ता.३१ ः ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनस्थळाला संत सोपानदेव , साहित्यपीठाला आचार्य अत्रे, ग्रंथनगरीला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निणर्य स्वागताध्यक्ष विजय कोलते, निमंत्रक रावसाहेब पवार व अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. अशी माहिती संमेलनाचे राज्य प्रसिद्धी समितीचे अध्यक्ष दशरथ यादव यांनी दिली.
यंदाचे संमेलन वादाशिवाय व्हावे, असा प्रयत्न सुरवातीपासूनच संयोजक समितीने केला होता. 
संमेलनातील सभागृहांना आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक, महात्मा फुले व श्रीमंत गोदाजीराजे जगताप यांची नावे देण्यात येणार आहेत. ग्रंथनगरीतील प्रकाशनमंचाला होनाजीबाळा यांचे तर प्रवेशद्वाराला भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर, बाळाजी विश्वनाथ पेशवे यांची नावे देण्यात येणार आहेत. महर्षी वाल्मिकीचे नाव कविकट्टयाला देण्यात येणार आहे. 
पुरंदर ही ऐतिहासिक भूमी असल्याने क-हाकाठी अनेक महापुरुष जन्माला आले. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महापुरुषांच्या नावाचे स्मरण व्हावे, अशी मागणी अनेक संघटनांनी केली होती. दरवर्षी संमेलन आणि वाद हे समीकरण होते. यंदा संमेलनाध्यक्ष निवडीपासूनच सगळ्या प्रक्रिया शांतते पार पडल्या. सगळ्याच दिग्गज महापुरुषांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न संयोजक समिती व महामंडळाने केला आहे. 


दशरथ यादव
अध्यक्ष
राज्य प्रसिद्धी समिती
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
मो.९८८१०९८४८१

Wednesday, November 6, 2013

Tuesday, October 22, 2013

कळू लागले

   कळू लागले


निसटलेले दिवस आता छळू लागले
जीवन माझे मला आता कळू लागले

थकून गेल्या बघा या जुनाट वाटा
पाय पुन्हा घरांकडे वळू लागले

खरेपणाने वागलो, डाग ना लागला कधी
शुभ्र कपडयातले मन आता मळू लागले

पावसाळा कोरडा गेला, शेती ओसाडली
कडक उन्हाळ्यात, आभाळ गळू लागले

उमगले मला जेव्हा, महत्व आयु्ष्याचे
वय दिवसाच्या मागे बघा पळू लागले

कित्येक मैल आता बालपण राहिले दूर
वार्धक्य खुणावताना तारुण्य चळू लागले

पेटते निखारे घेउन संकटे पचवली किती
हिरव्यागर्द मनाचे आतून पानही गळू लागले

निवडणूक अशी लढलो शत्रू भेदला आरपार
जिंकण्याच्यावेळी नेमकेच यार पळू लागले

दशरथ यादव, पुणे

जेजुरीचा खंडोबा

जेजुरीचा खंडोबा

----------------
मा. दशरथ यादव, पुणे
९८८१०९८४८१
-----------
जेजुरीचा खंडोबा व पंढरीचा विठोबा हे महाराष्ट्राचे लोकदेव आहेत. मराठी माणसांच्या मनामनात दोन्ही देवांबाबत तितकीत आपुलकी आहे. पुरंदर तालुक्यात पुण्यापासून सुमारे तीस मैल अंतरावर जेजुरी येथे खंडोबाचे देवस्थान आहे. धनगर, कोळी, मराठा, व इतर अनेकांचे हे आराध्यदैवत आहे.
इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले. सभोवतालच्या ओव-या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे. म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात आहे. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.
गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पाय-या, दीपमाळा, कमानी उभारल्या आहेत. बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची कल्पना येते.

जेजुरीचे शिखर व समोरच्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता.  देवळाच्या ओव-या ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत.
देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाजावरच देवाचा नगारखाना आहे. पूर्वाभिमुख देवळासमोर सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मढवलेले मोठे कासव आहे. यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस फार लोक करतात. चांगभले खंडोबांचा येळकोट असा जयघोष करीत या भंडाऱ्यांची उधळण होते. तळि भरणे हा एक विधी असतो. ताटात खोबरे व भंडारा घ्यावयाचा, पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावयाची व मग खोबऱ्याची उधळण करावयाची.
खंडोबा ही सकाम देवता आहे. नाना फडणवीस यांनी नवसाप्रीत्यर्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते. पंचवीस हजाराच्या मूर्ती केल्या, दगडी मंडपी रुप्याने मढवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली. मंदिरात चांदी-पितळेचे तीन मूर्ति-जोड होते. एक सोन्याचा जोड इ.स. १९४२ च्या सुमारास चोरीला गेला.

खंडोबाची यात्रा व जत्रा ः खंडोबाच्या यात्रा व जत्रा चैत्र, पौष व माघ या तीन महिन्यात शुद्ध द्वादशी ते वद्य प्रतिपदा हे पाच दिवस, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्टी असे सहा, वर्षातील सर्व सोमवती अमावस्या व आश्विनी शुद्ध प्रतिपदा ते दशमी अशा दहा दिवस असतात. देवास वाहिलेल्या मुला-मुलींचे वाघ्या-मुरळींत रूपांतर होते. कावडी घालणे किंवा नियत संख्येच्या पाण्याच्या कावडी वाहणे, वाघ्या-मुरळींकडून जागरण किंवा तळि भरणे-उचलणे, बगाड किंवा गळ टोचून टांगून घेऊन देवास प्रदक्षिणा घालणे, लंगर साखळी तोडणे, वारी किंवा भीक मागणे व हाळावरून (विस्तवारून) चालणे अशा अनेक प्रकारे नवसपूर्ती करण्यात येते. पौषी व माघी पौर्णिमांच्या यात्रांसाठी वर्‍हाड, खानदेश, कोकण इत्यादी भागांतून उपासक येतात. खैरे, होलम व होळकर यांच्या काठ्या म्हणजे लाल पागोट्याचे फडके गुंडाळलेले उंच कळक मिरवणुकीने वद्य द्वितीयेस कोटात येतात व शिखरास स्पर्श करून आपापल्या गावी परत जातात. नवरात्रातही देवाचा मोठा उत्सव असतो.

खंडोबाची स्थाने
--------------
जेजुरी (पुणे), पाली (सातारा), मंगसुळी (बेळगाव), देवरगुड्डा (राणीबेन्नूर), मैलार लिंगप्पा (खानापूर), बेल्लारी), मैलारपूर (यादगीर) (गुलबर्गा), आदि मैलार (बीदर), अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद), माळेगाव (नांदेड), सातारे (औरंगाबाद), शेगुड (अहमदनगर) व निमगाव धावडी (पुणे).
खंडोबा किंवा खंडेराय हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा, बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते. खंडोबाचे मुळ पीठ जेजुरी आहे.
खंडोबा हे नाव देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग > मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद > स्कंदोबा > खंडोबा) याखेरीज मल्हारी (मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.
कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.
खंडोबा म्हाळसा मणिमल्लांचा संहार करताना (मूळ शिळाचित्राचे साल - १८८०)
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरील सर्वाधिक महत्त्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य सांगतो की मल्हारीचा निर्देश ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात केला आहे. पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मूळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते. लोककथा या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रुद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तिपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटीय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बिदरजवळचे आदी मैलार स्थान आहे, असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी > नळदुर्ग > पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापाऱ्यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले. खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रिविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.
महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मा्र्तंड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे. जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती. मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला.
कुळाचार - दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.
जागरण - गोंधळ : देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
तळी भरणे : तळीभरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा ,सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्त्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा, भरीत आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात. खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात.


मल्हारी महात्म्य.

संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्त्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत.
एक वाघ्या - खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात.
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिसऱ्या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापाऱ्याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणाऱ्यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

दंतकथा
सावकारी भुंगा : औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने माळशिरसचा दौलतमंगल किल्ला काबीज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले, असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ला चढविला. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रुपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात.
भाया भक्ताची साक्ष : एकदा कडेपठारावर धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंगाची प्रार्थना सुरू केली. वडिलधार्यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंग फेकून दिले तेव्हा लिंगाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडील माणसेव विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला. तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कुऱ्हाड रुतली आणि त्यातून रक्तदुधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरील कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती.
जेजुरी : वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधिपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्रा उत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो. डफ, मर्फा, सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.
                               --------------------------------------------

Monday, October 7, 2013

संमेलन प्रसिद्धीप्रमुख यादव



संमेलनाच्या प्रसिद्धीप्रमुखपदी दशरथ यादव यांची निवड

---------------------------
३, ४ व ५ जानेवारीला सासवडला ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
-------------------------------------------------------------------------------------------
८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी दशरथ यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संमेलनाच्या सुकाणू समितीच्या बैठकीत ही निवड करण्यात आल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते व निमंत्रक रावसाहेब पवार यांनी सांगितले.
दि.३, ४ व ५ जानेवारी २०१४ रोजी सासवड़ येथे साहित्य संमेलन होत असून, आचार्य़ विकास प्रतिष्ठान व महाराष्ट्र साहित्य परिषद,शाखा सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने संमेलन होत आहे. क-हाकाठावर होणारे हे संमेलन भव्यदिव्य व्हावे असा सगळ्यांचा प्रयत्न असून, ते ऐतिहासिक व्हावे या दृष्टीने तयारी सुरु आहे. छत्रपती संभाजी महाराज, संत सोपानदेव, महात्मा फुले, शाहीर सगनभाऊ, होनाजीबाळा, आचार्य अत्रे, यशवंतराव सावंत अशी साहित्याची मोठी परंपरा क-हाकाठाला आहे. श्री यादव गेली गेली वीस वर्षाहुन अधिककाळ पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांनी वारीच्या वाटेवर, उन्हातला पाऊस, यादवकालीन भुलेश्वर, वारीचे खंडकाव्य, चार कांदब-या, दोन कवितासंग्रह, अंभग, लावणी, गाणी, पोवाडा, सिनेमासाठी कथा, पटकथा, संवाद व गीतलेखन केले आहे. राज्यभर शेकडो कविसंमेलनातून साहित्यचळवळ फुलवली आहे. शेकडो व्याखाने दिली असून, विपुलप्रमाणात साहित्यलेखन केले आहे.

Thursday, September 26, 2013

१) होनाजी बाळा


क-हाकाठचे साहित्यरत्न
-----------------------------
८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सासवड येथे ३,४,५ जानेवारी २०१४ रोजी सासवडला होत आहे. साहित्यक्षेत्रातील मराठी भाषेचा हा महत्वाचा साहित्य सोहळा
होत आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या साहित्यात मोलाची भर टाकणारे आणि मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, साहित्य निर्मीतीची ज्योत तेवत ठेवणारे
क-हाकाठवर प्राचीन काळापासून अनेक साहित्यरत्न जन्माला आली. त्या साहित्याच्या वारसदाराची माहिती करुन देणारी मालिका.... 
लेखक - दशरथ यादव

-------------------------
१) होनाजी बाळा 
---------------------------------
छत्रपती शिवाजी महाराजांचा वैभवशाली प्रेरणादायी इतिहास अंगाखांद्यावर मिरवीत संस्कृतीचा वारसा जोपासणा-या पुरंदरच्या क-हापठारावरील महान रत्नापैकी होनाजी व बाळा ही दोन अनमोल रत्ने. प्राचीन, अर्वाचीन, यादव, बहमनी, शिवशाही, पेशवाई, इंग्रज या सगळ्याच कालखंडात पुरंदरच्या क-हापठारचे योगदान कायम वाखाण्याजोगेच राहिले आहे. भौगोलिक दृष्ट्या निसर्गाची कृपादृष्टी झाल्याने, सात गड व नउ घाटांच्या सोबतीने क-हापठार पिढ्या न पिढ्या काळाशी सुसंगत अशीच कामगिरी करीत झळकत राहिला. मग काळ कोणताही असो. काळानुरुप पुरंदरच्या मातीची प्रेरणा घेऊन अनेकांनी गौरवशाली काम केले. 

वंशपरंपरागत शाहिरी
------------------
 होनाजी हा क-हाकाठावरील सासवडमधील गवळी समाजात जन्माला आला. तो त्याच्या घराण्याचा दुधाचा व्यवसाय करीत असे. पेशव्यांच्या वाड्यावर दुधाचा रतीब घालणे व सांयकाळी लावणी गाऊन, तमाशा करुन प्रसंगविशेषी मनोरंजन करीत. त्याचा गवळ्याचा व्यवसाय जसा वंशपरंपरागत तसा शाहिरीचा पण व्यवसाय वंशपरंपरागत होता. होनाजीचे आजोबा साताप्पा किंवा शाताप्पा हे व त्याचा चुलता बाळा हे दोघे नामांकित शाहीर होते. विशेषःता होनाजीचा चुलता बाळा हा लावणीकार होता. तो बाळा बहिरु या नावाने शाहिरी क्षेत्रात प्रसिद्ध होता. बहिरु नावाचा रंगारी हा बाळाचा मित्र होता. ते दोघे बाळा बहिरु नावाने तमाशाचा फड चालवीत होते. बाळाजीची हीच परंपरा पुढे होनाजीने चालविली. होनाजीचा साथीदार आणि मित्र बाळा करंजकर हा सासवडच्या शिंपी समाजातील होता. त्याच्या जोडीने होनाजीने आपला तमाशा गाजविला. त्याने होनाजी बाळा हे जोडनाव रुढ केले. 
होनाजी बाळा (इ.स.१७५४-इ.स.१८४४) मुळचा सासवडचा होता. नंतरच्या काळात तो पुणे येथे राहत होता. होनाजीचे आजोबा सातप्पा शिलारखाने हा पेशव्यांचा आश्रित व नावाजलेला तमासगीर होता. होनाजीने रागदारीवर अनेक लावण्या लिहिल्या. त्यांच्या नावावर २५० लावण्या आहेत. काही पोवाड्यांची रचना त्यांनी केली. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या लावणीला आज भूपाळीचे म्हत्व प्राप्त झाले. होनाजी काव्य करायचा व बाळा गायन करीत होता. म्हणून त्यांच्या फ़डाला होनाजी बाळाचा फड असे म्हणत. 

पोवाड्याची रचना
--------------------
लावणीचे शब्दसामर्थ्य आकर्षक होते. शब्दरचना बांधीव मुलायम होती. सहजता व शृंगाररसाचा अदभुत प्याला होनाजीने रसिकांसमोर ठेवला.इतकेच नाही तर विरहाची लावणी, गरोदर स्त्रीच्या दुःखाची लावणी, वांझेची लावणी अशा विविध लावणीतून स्त्रीमनाचे दर्शन त्यांनी घडविले. होनाजीनी काही पोवाडे रचले आहेत. खड्र्याची लढाई, रंगपंचमीचा पोवाडा, दुस-या बाजीरावाचा पोवाडा, असे अनेक पोवाडे रचले. शिमग्याचे पाच दिवस ते सरकारवाड्यापुढे तमाशा सादर करीत. होनाजीला सालीना तीनशे रुपये वर्षासन मिळत होते. पेशवाई बुडाल्यानंतर बुडाल्यानंतर बडोदेसरकारकडून त्यांना वर्षासन मिळे. पेशवाई गेल्यानंतर होनाजीने लिहिलेला पोवाडा अतिशय ह्दयद्रावक आहे. होनाजीने पेशवाईतील रंगढंग मोठया कलात्मकतेने व यथेच्छपणे रंगविले आहेत. होनाजीने रचलेल्या लावण्यात अंतरीक प्रेम, जिव्हाळा, सामाजिक नीती याची कदर इतर शाहिरांपेक्षा जास्त आहे. लावणीरचना सरळ, ओघवती, शब्दलालित्याने नटलेली आहे. होनाजी स्वतःच्या लावण्याबरोबर बाळा करंजकर यांच्याही लावण्यात गात असत. सासवडही होनाजीची अजोळभूमी सासवड. काव्याची पुष्पाची पहिली पाकळी त्यांनी येथील काळभैरवनाथाच्या चरणी अर्पिली आहे. धनाने दारिद्रयात असलेला हा शाहीर सासवडला धान्यबाजारपेठेत हल्लीच्या शेडगे यांच्या दुकानाच्याजवळ राहत होता.त्याचा जिवलग मित्र बाळा करंजकरचे घर पाकडी जवळ दगडोबा शिंदे यांच्या वाड्यात होते. होनाजीचा अंत दिवेघाटातील बाभुळबनात मारेक-यांच्या हल्ल्यात झाला. 

मर्द मराठी थाप डफावर
खन खन खंजीर बोले सत्वर
तुण तुण तुण तुण म्हणे तुणेतुणे
झुनक झुनक झांज किणकिणे
 सूर खडा शाहिरी धडाधडा म्हणे पोवाडा जोशात
थेट तशी गम नेट लावून सुरकरी करती साथ
नसानसातील रक्त रसाला येईल आज उधान 

अशा मराठा बाण्याच्या काव्यातून म-हाठ मोळा रांगडेपणाही खळखळाळत होता. होनाजीची भूपाळी त्याच्या सात्विक भाषेचा प्रत्यय देते. हुबेहुब शब्दचित्रे तयार करण्याचे शब्दसामर्थ्य त्यांच्या काव्यात होते.

हुरहुर करतो माझा जीव
न ये जरा तुजला कीव
सजणा, नको दूर देशी जाऊ सजणा 

किंवा

लटपट लटपट लटपट लटपट
तुझ चालणं गं मोठ्या नख-यांचं
बोलणं गं मंजुळ मैनेचं
नारी गं नारी गं...

कांती नवनवतीची दिसे चंद्राची प्रभा ढवळी
जाईची रे वेल कवळी
दिसे नार, सुकुमार, नरम गाल, व्हट पवळी
तरुणपण अंगात झोकं मदनाचा जोरात
चालणं गं मोठ्या नख-याचं
बोलणं गं  मंजुळ मैनेचं.
नारी गं नारी गं....

हे अमर भूपाळी या सिनेमातील गीत मराठी माणसांच्या मनामनात कोरले आहे. वसंत देसाई यांचे संगीत व लता मंगेशकर यांनी गायले आहे.

होनाजीवर मारेकरी घातले
--------------------------
होनाजीला वंशपरंपरेने कवित्वाची देणगी लाभली होती. पुराणकथा व पंडिती काव्याचा त्याचा अभ्यास होता. होनाजीची बैठकीची लावणीही प्रसिद्ध होती. शास्त्रीय रागदारीवर  संथचालीवरच्या लावण्या त्यांनी रचल्या. तमाशा लावणीला तबल्याच्या ठेक्याची साथ देणे होनाजीने सुरु केले. शास्त्रीयगायन तमाशात आणणे आणि ढोलकीबरोबर वा स्वतंत्रपणे तबल्याचा ठेका घेणे अनेकांना मंजूर नव्हते. त्यामुळे विरोधकांनी बाजीरावाचे कान भरले. होनाजीला तमाशात तबला आणण्यास मनाई झाली. होनाजी हट्टाला पेटला. त्याने आव्हान म्हणूनच ही घटना स्वीकारली. तो आपल्या अहिली नावाच्या शिष्येला घेऊन पुणे सोडून मुंबईला आला. मुंबईत राहून शिष्येच्या गळ्यावर शास्त्रीय गायकीचे संस्कार केले. व्यवस्थिक तालीम करुन लावणी शास्त्रीय ढंगात म्हणण्यात त्या शिष्याला पारंगत करुन तबल्याचा समावेश पुन्हा दरबाराच्या कार्यक्रमात सुरु केला. होनाजीने लावणीच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम केले. होनाजीचे जीवन अनेक नाट्यपूर्णँ घटनांनी भरले आहे. दुस-या बाजीराव पेशव्याचा निकटवर्ती कारभारी त्र्यंबकजी डेंगळे हा होनाजीचा आश्रयदाता व जवळच्या संबधातील होता. होनाजी सगळी मिळकत डेंगळ्याच्या वाडयात ठेवत असे. पुढे राजकारणाच्या उलट्या तेढ्या फे-यात डेंगळेची मिळकत इंग्रजाकडून जप्त झाली. त्यात होनाजीची व्यक्तिगत चीजवस्तूही नाहीशी झाली. होनाजी कफल्लक झाला.कुठून तरी कसे तरी चार पैसे मिळवावेत व चरितार्थ चालवावा असे काहीसे त्याचे जीवन सुरु होते. जीवनात सगळीकडे होनाजीने चांगले यश मिळविले. त्यामुळे स्वाभाविकच विरोधकांची पोटदुखी वाढलेली होती. होना गवळ्याचा चुना, असे त्यांच्या स्थितीबद्दल विरोधकांनी म्हटले आहे. त्याच्या विरोधात असलेल्या कोणा पाताळयंत्रि माणसाने होनाजीवर मारेकरी घातले. असह्य शस्त्राच्या माराने होनाजीचा छिन्नविच्छिन्न देह पुणे शहरात आणून टाकला. दारुण यातनांनी होनाजी गतप्राण झाला. तो दिवस होता भाद्रपद कृष्णचतुदशी.

होनाजीबाळा संगीत नाटक
----------------------------------
संगीत नाटकांचा एक सुवर्णकाळ होता. होनाजीबाळा हे संगीत नाटक भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, माया जाधव हे कलाकार काम करीत. सध्या मुंबई साहित्य संघाने हे नाटक पुन्हा रंगमंचावर आणले आहे. शहाजी काळे, स्वप्निल परांजपे, बाळा नाईक, अभिनय भोसले, राणी भोसले हे कलाकार आहेत. घनश्याम सुंदरा या भूपाळीने नाटकाला मोठी लोकप्रियता मिळाली.
`घनःश्याम सुंदरा’ ही श्रवणीय भूपाळी नव्या-जुन्या मंडळींनी रेडिओवर ऐकलेलीच आहे. त्याचप्रमाणे `श्रीरंगा कमला कांता’ ही गौळणही बहुश्रूत आहे. पण मूळ कथानकासह त्याचा अनुभव आपल्याला `होनाजी बाळा’ या नाटकात घेता येतो. होनाजी हा एक गवळी. तर बाळा तमासगीर. या दोन वेगवेगळ्या व्यक्तिरेखा. पण एकाच शरीरातील आत्मा असे हे नाते. दोघांना वेगळे करता येत नाही. होनाजीशिवाय बाळाला अस्तित्व नाही आणि बाळाशिवाय होनाजीचा विचारच होऊ शकत नाही, असे हे घट्ट नाते. होनाजी जितका गंभीर तितकाच बाळा हा मिश्किल. गाईंना चरायला नेल्यानंतर होनाजीला कवने करण्याचा नाद. त्याच्या कुळाचा मूळपुरुष श्रीकृष्ण याच्यापासून ही संगीताची देण लाभलेली. पण सर्वच काळात सर्वच कला लोकप्रिय होतातच असे नव्हे. होनाजीचा कवनांचा छंदही काहीकांना पसंत नव्हता. पण कलावंतीण गुणवती ही मात्र त्याच्या कवनांवर भारलेली असते. होनाजीने कवणे करावीत आणि यमुना-गुणवती या मायलेकींनी ती बाळाच्या साहाय्याने पेश करून `वजनदारां’ना खूश करणे हा उत्तर पेशवाईतील परिपाठ होता. या गुणवतीची कीर्ती पुण्यात पंचक्रोशीत पसरली होती. त्यातूनच उदाजी बापकर हा युवा सरदार तिच्या अदाकारीवर भाळतो. तिच्या एकतर्फी प्रेमातच पडतो. पण गुणवतीचा जीव अडकलेला असतो होनाजीत आणि त्याच्या शाहिरीत. यातूनच होनाजी व बाळा यांचे उदाजीशी वैर उभे राहते. मोरशेट हा सुरुवातीला उदाजीच्या मागे असतो. पण आपली मर्यादा सांभाळून जेव्हा पेशवाई डबघाईला येते तेव्हा समशेरीच्या जोरावर ती सावरण्याऐवजी हा उमदा सरदार होनाजीचा काटा काढण्यावर भर देतो. एकीकडे प्रेम, दुसरीकडे शाहिरी यात हे द्वंद्व होते. कला ही कोणाची बटीक नसते, हे होनाजी उदाजीला ठासून सांगतो. अखेरीस तलवारीपेक्षा शाहिराची डफावरील थापच सरस ठरते. असा हा सारा `होनाजी बाळा’चा मामला. आहे.

याहो याहो रसिकवरा
द्या कान जरा, लावा नजरा
शाहीराचा घ्या मुजरा

मराठी जीवनाचे प्रतिबिंब प्रत्यक्ष शाहिरीत उमटले आहे, मराठी वाडःमयातील बावनकशी सोनं म्हणजे लावण्या व पोवाडे आहेत. मराठीशाहीच्या उदयाबरोबर शाहिरी काव्य जन्मले. या काव्यात मराठीशाहीचे प्रतिबिंब असून, वीर रसाची उधळण करणारे पोवा़डे व दिलखेचक अदाकारीच्या शृंगारिक लावणीने मराठी साहित्यात व मनांमध्ये वेगळेच स्थान निमार्ण केले. अशा शाहीर होनाजी बाळाच्या डफाच्या थापेवर व तुणतुण्याच्या तारेवर महाराष्ट्र नागासारखा डोलला  आहे. घनश्याम सुंदरा, श्रीधरा अरुणोदय झाला या सात्विक, प्रसन्न भूपाळीप्रमाणेच होनाजी अमर झाला. 

तू पाक सूरत कामिना
तू पाक सूरत कामिना कि दाहि बोटी मीना, हातामध्ये वीणा घेऊनिया गाती
तुला गुणिजन अवघे चहाती

नारी तुझी गजाची ग चाल, भांगी गुलाल मुलायस गाल
नवीनवती तू चंद्रकळा सवती, गायनामधे गुणिजन सविती
कंबर बारिकशी कुंद, मनामध्ये फुंद, मिजाजत धुंद खुले तव कांती
तुला गुणिजन अवघे चहाती

नाकी नथनी ग सर्जेदार, फुले अंगी जोहार ग फार
वनी जणु हे पळसतरु फुलले, गुणावर जन अवघे हे भुलले
म्हणे होनाजी बाळा गडे, अहो फाकडे, तुझी चहुकडे गुणाची हो ख्याती
तुला गुणिजन अवघे चहाती

अशा प्रकारची प्रभावी गीत रचना करणारा होनाजी हा एक प्रतिभावंत शाहीर होता.

Friday, September 20, 2013

भारतदर्शन संस्कृती

भारतीय संस्कृतीचे आद्यवाडःमय

१) सूतवाडःमय व सूतसंस्कृती

भारतीय वाडःमयात वेदग्रंथाचे आक्रमण होण्यापूवी सूत संस्कृती ही पुर्वेस बिहार, दक्षिणेत दंडकारण्यापर्यंत पसरली होती. सिंहलद्वीपातही हीच संस्कृती होती. शिव, विष्णू ही या संस्कृतीची दैवते. यांचा विद्याधर, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, किन्नर, पिशाच्च व देवयोनिवंर या संस्कृतीचा विश्वास होता. यात अग्निधर्म संपुष्टात पण थोडा शिल्लक होता. यात मुनि व यति हे दोन परमार्थास वाहिलेले वर्ग होते.वीरकथा, दृष्टांतदाखले,, उपदेशपरकथा हे साहित्य होते.या संस्कृतीचा काळ म्हणजे दाशराज्ञ युद्धपूर्व म्हणजे दाशरथी रामाचा काल येतो. मातृ व सूत संस्कृतीचया लोकांचा संबध आल्यावर दोहोंची मिळून एक संस्कृती गंगेच्याकाठी निर्माण झाली. सूतांशी संबध जोडण्यासाठी पौराणिक ग्रंथातील राजांची नावे यज्ञविधीशी जोडण्यात आली. तसेच नाग, गंधर्व पिशाच यांन यज्ञविधीतील दिवस वाटले व शिव, विष्णूंची अर्वाचीन काळी परिचित स्वरुपे तक्तालीन वेद व यंज्ञमंत्रात शिरली. या दोघांच्य संपर्काने यज्ञकर्म तात्पुरते विस्तीर्ण झाले.पुढे देशांची उचल होऊन यज्ञकर्म संपुष्टात आले. तसेच भारतीय संस्कृतीस पुन्हा सूतसंस्कृतीचे वळण मिळाले. वैदिक संस्कृती केवळ अंगास चाटून गेल्यासारखे झाले. परंतु पुढे यज्ञकर्तेपणामुळे उत्पन्न झालेली ब्राम्हणज्ञातीने पुढे स्थानिक संस्कृती जशी अशी घेऊन तिचे विधिनिषेधे, उत्सव, वाडःमय,सणवार यांच्यामध्ये व्यवस्थिपणा आणण्यास सुरवात केली. त्यामुळे सूतसंस्कृतीचे स्वरुप जरी बदलले नाही तरी तिच्यावर वेदास मानणा-या ब्राम्हणाचे दडपण पडले. व या संस्कृतील लोक वैदिक संस्कृती म्हणू लागले. आपणापाशी जे सूतसंस्कृतीचे जे वाडःमय. आहे ते ब्राम्हण, बौद्ध व जैन आवृतिकारांनी विकृत केलेले मिळाले आहे. त्यामुळे सूतसंस्कृती कथेचे खरे स्वरुप हे अनुमानानेच काढावे लागते. महाभारत हे त्या प्रकारच्या कथांचे मुख्य संग्रहस्थान आहे. काही सूतकथा रामायण, पुराणे यात ग्राथत झाल्या तर काही कथासरित्सागर
ग्रंथात आहेत.

महाभारत (सूतकथा) -

महाभारत हा एक वीरकथासंग्रह असून तो काव्यमय ग्रंथभांडार आहे. महाभारत म्हणजे भरतांच्या महायुद्धाचा वृतांत. भरत हे क्षात्रिय राष्ट्र होते. दुष्यंत व शकुतंला यांचा पूत्र भरत हा भरतांच्या राजवंशाचा मूळ पुरुष. हे गंगा यमुना नद्यांच्या वरील भागाकडे राहत. या वंशजापैकी कुरु राजा फार प्रमुख  होता. त्यांचे वंशज ते कौरव. हे भारत लोकांवर खूप काळ राज्य करीत होते. त्यावरून एका राष्ट्राला कुरु कौरव हे नाव मिळाले. यालाच कुरुक्षेत्र असे म्हणतात. महाभारत हा शब्द महाभारताख्यानम याचा संक्षेप शब्द आहे. कौरवांच्या राजघराण्यातील भांडणावरुन रक्तपात झाला. यात कुरु व भरताचे घराणे यांचा नायनाट झाला. महाभारतावरून युद्धाची माहिती मिळते पण पुरावे सापडत नाही. तरी महाकवीने युद्धाची हकीकत गीताच्या रुपाने मांडली आहे.शेकडो वषार्षात या वीरकाव्यात बराच समावेश होत गेला. अनेक दंतकथांचा त्यात समावेश झाला...महाभारताचे मूळ काव्य हे सुतकथामधील भाग आहे. परंतु त्यात कालानुरुप अनेकांनी समानेश केल्याने त्याचे मुळकथानक किंवा काव्य शोधण जड आहे. महाभारत हे वीरकाव्य आहे. पण तसेच ते सुतांचे साहित्यभांडार आहे. वीरकाव्य ही सूतांची असून ती ब्राम्हणांच्या ताब्यात कशी गेली. त्यात काय बदल झाले. सूतांच्या वीरकाव्याचा त्यांनी उपयोग करुन पौराणिक देवाच्या गोष्टी रचून, धर्मशास्त्र, ज्ञान, उपदेशपर गोष्टी, ब्राम्हणतत्वज्ञान यात उपयोग करुन ब्राम्हणांचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न केला. वीरकाव्यात अदभुत दंतकथा व गोष्टी घुसडुन त्याकाळी समाजावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. महाभारत हे फार लोकप्रिय असून, क्षत्रिय लोकामध्ये त्याचा प्रसार झाल्याने या ग्रंथावर वैदिक परंपरेचा संस्कार झाला नाही. वेद जाणणा-या ब्राम्हाणांनी ग्रंथ फार दुरुस्ती करुन सुधारविण्याचा प्रयत्न केला नाही. कारण क्षात्रधर्म मृतकल्प होऊन अरण्यकयी धर्माकडे ब्राम्हणाधि सगळे गेले त्यामुळे ब्राम्हणांचे वर्चस्व असलेल्या ठिकाणीही धर्म व यज्ञयागाबाबत अगदी थोडी माहिती आढळते. महाभारतात सुधारणा करुन त्यांचे उपबहृण करण्याचे काम ज्यांनी केले ते बहुधा पुरोहितच होते. शिव, विष्णू या पौराणिक देवांच्या कथांची जोपासना त्यांनीच केली. पुराणाच्या धतीर्तीवर स्थानिक कथा, विष्णू व शिव यांच्या कथा यांचा प्रवेश महाभारतात झाला. ज्या ठिकाणी मोठा देव म्हणून विष्णूची पूजा प्रचलित होती तेथे वीरकाव्याची अधिक जोपासना झाली. ब्राम्हणाशिवाय हिंदुस्थानात धर्मपारायण लोकांचा एक वर्ग होता. ते हिरारीने वाडमयाचा प्रसार करीत. हे संन्यासी, वानप्रस्थाश्रमी व भिक्षू लोक होत. बुद्धांच्यावेळी प्रचलित असलेले पंथ याच लोकांनी काढले. यतिचे तत्वज्ञान व नीतीशास्त्र याचाही महाभारतात पुढे समावेश झाला. महाभारत हे वीरचरित्र असले तरी भारतीय ग्रंथकार ते महाकाव्य असे समजतात. या ग्रंथाचे अठरा भाग केले असून प्रत्येकाला पर्व असे नाव दिले आहे. हरिवंश या नावाचा एक भाग पुरवणीत जोडला. शंभर पर्वामध्ये विभागणी केलेल्या एकदंर श्लोकांची संख्या एकलक्ष आहे. कृष्णद्वपायन ऋषी किंवा व्यास त्याने हा ग्रंथ रचला असे म्हणतात. महाभारतातील नायकांचा हा समकाली व नातलगही होता असा त्यांचा संबध आढळतो. काव्याची दंतकथात्मक उत्पती दिली असून, मूलधर्मग्रंथ या दृष्टीने स्तुती केली. जुन्या लेखाचे काव्यात नवीन लोकांनी टाकलेली भर स्पष्टपणे रचनेवरुन जाणवते. महाभारत हा एकच ग्रंथ नसून अनेक ग्रंथाचे भांडार आहे.

व्यास जन्माची दंतकथा

- पराशर नावाचा ऋषीचा हा पूत्र. एके दिवशी सत्यवती या ऋषीच्या नजरेस पडली. ही मुलगी एका कोळ्याला माशाच्या पोटात सापडली होती. कोली लोकांनी तिचे पालन व पोषण केले. तिचे सौदर्य पाहुन मोहित होऊन तिच्या बरोबर समागम करण्याची ईच्छा त्याने व्यक्त केली. पूत्र झाल्यावर आपले क्रौमार्य परत मिळावे या अटीवर तिने ऋषीचे म्हणणे कबुल केले. दोघांचा समागम झाल्यानंतर यमुनानदीमधील एका द्वीपामध्ये तिला पूत्र झाला. द्विपामध्ये जन्मला म्हणून त्याचे नाव द्विपायन ठेवले. तो मुलगा मोठा झाल्यावर तप करायला निघून गेला. सत्यवती पुन्हा कुमारी झाली. नतर कुरुराजा शंतनु याच्याशी तिचे लग्न झाले.चित्रांगद व विचित्रवीर्य असे दोन पुत्र तिला झाले. शंतनु व चित्राडगद मरण पावल्यावर विचित्रवीर्य राजा झाला. पण तो निपुत्रिक झाला. त्याला दोन बायका होत्या. आपला वंश बुडु नये म्हणून धर्मशास्त्रानुसार द्वैपायनाने भावजयीच्या ठिकाणी संतती उत्पन्न करावी यासाठी सत्यवतीने द्वैपायना बोलावणे पाठविले. द्वैपायन हा कुरुप होता तरी काळा केस दाढी कांती काळी होती. (म्हणूनच त्याचे कृष्ण नाव काळा म्हणून असावे.) त्याचा प्रंचड वास येत होता. एका राजपुत्रीजवळ तो जाताच त्याची मुद्रा असह्य झाल्याने तिने डोळे मिटून घेतले तिला जन्मांध पुत्र झाला तो हाच धुतराष्ट्र होय. व्यास दुस-या स्त्रीजवळ गेला तेव्हा त्याला पाहुन ती पांढरी फटफटीत झाली. तिला निस्तेच असा पूत्र जन्माला आला तो म्हमजे पांडू.महाभारतातील पाच महानायकांचा हा पिता. द्वैपायनाने आणखी एका स्त्रीशी समागम करण्याचे ठरविले परंतु ती हुशार असल्याने तिने आपल्या एवजी दाशीला पाठविले.ही गोष्ट ऋषीच्या लक्षात आली नाही. त्या दाशीला विदूर नावाचा पूत्र झाला...पांडु व धृतराष्ट्र यांचा तो मित्र होता. धृतराष्ट्राचा विवाह गांधार राजकन्या गांधारी हिच्या बरोबर झाले. त्चांना शंभर मुलगे. दुर्योधन हा थोरला होता. पंडुंला दोन बायका होत्या. थोरली यादवराजकन्या कुंती व धाकटी मद्रराजकन्या माद्री. कुंतीला धमर्म,भीम,अर्जुन व माद्रीला नकुल व सहदेव ही मुले होती. हा कुरुप व दुर्गंधीवान ऋषी कृष्णद्वैपायन व्यास हा महाभारतातील नायकांचा पितामह होता असे अनक ग्रंथावरुन समजते. महाभारतातील या दंतकथा व मांडणी किंवा उत्पत्ती वास्तव वाटत नाही. व्यासानी आपले मोठेपण  सिद्ध करण्यासाठी केलेला हा खटाटोप असावा असेही दिसून येते..

महानायकांचा जन्म
१८८६ साली जर्मनीत एडाल्प हाल्टझमन यांनी एक पुस्तक प्रसिद्ध करुन महाभारताच्या स्वरुपाची चिकित्सा केला. महाभारतात खूप काव्य शिरल्याने तो वीरगीतांचा अवशेष होता. जुन्या ग्रंधाच्या शब्दशा भाषांतरापेक्षा प्राचीन सुतवर्ग
जे महाभारत गात त्यावरुन केलेला अभ्यास हा योग्य होईल असे त्याला वाटले. कौरव पांडवाच्या लढाईचा मुख्यभाग शोधणयाचा प्रयत्न केला.

भरतखंड  ः 

हिंदुस्थान हे, चीन, असुरिया, बाबिलोनया, पॅलेस्टाईन इजिप्त, या प्राचीन राष्टापैकी आहे. एतिहासिक काळ अजून निश्चित नसला तरी काही प्राचीन लेख, खोदलेख, इमारती, वाडमय याचे संशोधन होउन काळ निश्चिक होणे बाकी आहे. ख्रिस्तपूर्व निदान चार हजारवर्षे पासून मयादा समजण्यासा वाडमयाचा पुरावा आहे. हिंदुस्थानचे प्राचीन भूवर्णन काळात विभागले आहे. महाभारतकाल, वेदकाल, सिंकदरकाल, अशोककाल, कनिष्ककाल, गुप्तकाल, हूणकाल,हर्षकाल, चोलकाल,चव्हाणकाल,यादवकाल, विद्यारण्यकाल असे कालखंड आहेत. वेदकाळापूवी द्रविड व आर्य यांची वस्ती होती. रामरावण युद्ध त्यावेळचे होते. रामायणातील वर्णन वेदपूवकाळातील मान्यकरता येत नाही कारण नंतरही टप्याने त्याचे लेखन झाले आहे. देशाचे वणर्णन वेदकालीन ग्रंथातही त्रोटकच आहेत. भरतखंडाच्या वर्णनात देशातील नद्या, पर्वत, प्रदेशांची यादी आहे. भरतखंडात १५६ देश सांगितले तर ५० देश हिंदूस्थानात आहेत. उत्तरेकडील म्लच्छाशिवाय २६ देश सांगितले आहेत. कुरुक्षेत्राच्या दक्षिणेस शूरसेन देश. याची राजधानी मथुरा यमुना किना-यावर आहे. पश्चिमेस मत्स्यदेश (जयपूरजवळ० होता.कुंतीभोजाचादेश चर्मणवती नदीकाठी (ग्वाल्हेर). निषिधदेश (नलराजाचा देश) नरवारप्रांत शिंदेसरकाराच्या ताब्यात आहे तो. अवंती म्हणजे माळवा.,उज्जयनी, विदर्भ म्हणजे हल्लीचे व-हाड, राजधानी भोजकट होती. महाराष्ट्राचे नाव संबध महाभारतात कोठेच नाही. याचा अर्थ महाराष्ट त्यावेळी नव्हता असे नाही. मोठे स्वरुप आले नवह्ते. त्याचे लहान लहान भागांची नावे                 महाभारतातील देशांच्या यादीत आली आहेत. रुपवाहित, अश्मक, पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र या तीन राष्टांचे मिळून महाराष्ट्र पुढे बनले. यात मुळीच शंका नाही. भोजांचे जसे महाभोज झाले. तसे राष्ट्रांटे महाराष्टिक झाले. अश्मक हा देश देवपीरीच्या भोवतालच्या प्रदेशाला धरुनच होता. महाराष्ट्रातील लोकापैकी अश्मक हे मुख्य होते, गोपराष्ट्र हा नाशिकच्या भोवतालचा प्रदेश. पांडुराष्ट्रही त्याला जोडुन असावे. मल्लराष्ट्रहि एक भाग असावा. चारपाच लोकांचे राष्ट्र मिळून ते महाराष्ट्र म्हणून प्रसिद्धीस आले असावे. गुजरातचा महाभारतात उलेख नाही मात्र सौराष्ट्राचा आहे. दक्षिणेकडे जे देश सांगितले ते कोकण, मावळ. मालव म्हणजे घाटमाध्यावरील मावळे. दक्षिणेतील आणखी चोल, द्रविड, पांडुय, केरल, माहिषक हो होत. यांची नावे चोल -मद्रास, चोलमंडल-कोरोमंडल, तंजावर हे द्रविड होय, पाडुय तिनेवल्ली, केरल-त्रावणकोर, माहिष-म्हैसूर ही नावे ठरविता येतात. पश्चिमेकडील सिंधू-सिंधप्रांत, सौबीर, कच्छ हो देश होत.कच्छच्या उतरेला गांधार आहे. मध्य हिंदुस्थानात सतलजपासून गंगेच्यचा मुखापर्यंत येत. सुपीक व भरभराटीच्या प्रांतापैकी बहुतेक प्रांत येत. ह्युएनत्संगच्या वेळच्या ८० राज्यापैकी, ३७ राज्य यात होती. स्थानेश्वर, वैराट, मत्स्यदेश, श्रुन,मडावर, ब्रह्मपूर, अहिचछत्र, पिलोपेण, संकिसा, संकास्या, मथुरा, कनोज, अयुटो, उत्पलारण्य, हयमख प्रयाग, कौशांबी, कुशपूर, विशाखा, साकेत, अयोध्या, श्रावस्ता कपिली, कुशीनगर, वाराणशी, गजपतिपूर, वैशाली, वज्र, नेपाळ, मगध, हिरण्यपर्वत, चंपा, कांकजोल, पौड्रवर्धन, जझोटी, महेश्वरपूर, उज्जनी,माळवा, खेडा, आनंदपूर, वचडारी, इदर.
 पुर्वेकडे हिंदुस्थानात आसाम, बंगाल, संभळपूर, ओरिसा, गंजम, तापी व महानदी भागात कलिंग, राजमहेंद्री, कोसल, आंध्र, तेलगण, धनकट, कांचीपूर, कोकण.धनककट देशाचा परिसर १००० मैल. जोरिया- ४०० मैल, द्रविड-१००० मैल, कोकण,  मथुरा, परिसर ८३३ मैल, महाराष्ट्राच्या राजधानीपासून भडोचचे अंतर १६७ मैल होते. देशाचा घेर १००० मैलाचा होता.राज्यच्या पुवेला मोठा बुद्धविहार होता. सिलोन हे सातवया शतकात सिंहलदीप नावाने प्रसिद्ध होते. तेथून आलेले यात्रेकरु ह्युएन यास कांची येथे भेटले त्याच्यापासून सिलोनची माहिती मिळाली. घेर ११६७ मैल होता. उतर दक्षणि लांबी २७१ मैल व रुंदी १३७ मैल होती. 

यादवकाळ ः
 (१४ वे शतक) दक्षिणेत देवगिरी यादव राज्य करीत असताना उत्तर हिंदुस्थानात राज्यक्रांती झाली. तेथील गुलाम घराणे जाऊन खिलजी घराणे अधिषठित झाले. अल्लाउद्धीन खिलजीने दक्षिणेवर स्वारी करुन रामदेवराव यादवापासून एलिचपूर घेतले. तसेच गुजराथ काठेवाड पादाक्रांत केले. कच्छ मात्र आपले स्वातंत्र्य कसेबसे टिकवून राहिले. चितोड, सिबाना  जालोर मुसलमानांच्या हाती पडली. खिलजीचा सुभेदार मलिक काफरने दक्षिण दग्विजयाला प्रारंभ केला. वारंगळचा राजा मुकाट्याने त्याचा मांडलिक बनला. रामदेवला पुन्हा पराभव स्वीकारावा लागला. बल्लाळाचे राज्य खालसा झाले. महाराष्ट्र व कर्नाटक मुसलमानाचे स्वामीत्व पत्करले.१३१८ ला मलिकने मलबार जिंकले यादवाचे राज्य संपले.

Thursday, September 19, 2013

दशरथ यादव यांची वैयक्तीक माहिती






                                               दशरथ यादव यांची वैयक्तिक माहिती
                                            ----------------------------------------
                                                 

नाव ः दशरथ राजाराम यादव
कायमचा पत्ता - मु.पो.माळशिरस (भुलेश्वर) ता.पुरंदर जि.पुणे
पुणे निवास ः स.न. १७६ भेकराईनगर (ढमाळवाडी) महाराष्ट्र काॅलनी, पो फुरसुंगी ता.हवेली जि.पुणे.
मोबाईल. ९८८१०९८४८१ ईमेल- yadav.dasharath@gmail.com
शिक्षण ः एंम ए (बीसीजे)
जन्मतारीख ः ८-१०-१९७०
व्यवसाय ः पत्रकारिता व साहित्यलेखन
व्याख्याता ः पुणे विद्यापीठ (बहिशाल विभाग)
छंद व कला - साहित्यलेखन, वाचन, नाटक, वक्तृत्व, प्रबोधन, अभिनय,समाजसेवा, क्रिडा, इतिहास संशोधन, पर्यावरण, लोककला, संत साहित्य अभ्यासणे

अनुभव
१) १९८९ पासून पत्रकारितेला सुरवात. दैनिक पुढारी, केसरी, सकाळ, नवशक्ती, सुराज्य, पुणे ट्रिबयून, मी मराठी (वाहिनी)
२) १९९१ ते १९९४ दैनिक पुढारीची पुणे आवृतीची जबाबदारी.
३) दै.सकाळ सासवड बातमीदार म्हणून १९९५ ते २००१ पर्यंत काम. २००१ ते २००२ लोकमत पुणे, ४) ४) २००२ ते २००३ दैनिक पुढारी पु्न्हा उपसंपादक म्हणून काम. २००३ ते२००४ दै. सुराज्य मुख्य बातमीदार  म्हणून काम.
५) २००४ ते २००५ दैनिक नवशक्ती, मुंबई पुणे प्रतिनिधी म्हणून काम. २००५ ते २०१० पयर्यंत दैनिक  सकाळ पुणे (उपसंपादक) जबाबदारी  पेलली.
६) मी मराठी (वाहिनी) पंढरीची वारी २० दिवसाचे लाईव्ह वार्तांकन केले
७)  वीस वर्षे अनेक साहित्य संमेलनातून कविता सादर, दिवाळी अंक, दैनिक, मासिकातून चौफेर साहित्य लेखन केले.
८) दै.सकाळमधून पंढरीची वारीचे वारीच्या वाटेवर या सदरातून केलेले लेखन विशेष गाजले.
९) आकाशवाणी, दुरदर्शन केंद्रावरुन कविता वाचन

साहित्य लेखन -
१) यादवकालीन भुलेश्वर - संशोधनात्मक ऐतिहासिक पुस्तक
२) उन्हातला पाऊस - कवितासंग्रह
३) सत्यशोधक दिनकरराव जवळकर
४) वारीच्या वाटेवर (ऐतिहासिक कांदबरी)
५) वारीचे अंभग
६) पंढरीची वारी खंडकाव्य
७) शिवधर्मगाथा
८) गुंठामंत्री (कांदबरी)
९) रणांगण या मराठी चित्रपटाची पटकथा व संवाद
१०) पुरंदरचा इतिहास
११) पोवाडा पुरुषोत्तमाचा
१२) गाणी शरद पवारांची
१३) कथासंग्रह
१४) घुंगूरकथा
१५) पोपटरावांची विकासगाथा (आत्मचरित्रपर)
१६) लेखणीची फुले (सामुहिक कवितासंग्रह)
१७) प्रगती (दैनिक सकाळमधील शेतीविषयक लेखाच्या पुस्तकांची संकल्पना व संपादन)
१८) शिवधर्म विशेषांक

आडिओ व व्हिडीओ
१) दिंडी निघाली पंढरीला (मराठी सिनेमाची कथा)
२) महिमा भुलेश्वराचा (गीतअल्बम)
३) सत्याची वारी (माहिती पटाचे लेखन)
४) भक्तिसागर (संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा माहिती पट लेखन)
५) रणांगण (मराठी सिनेमा पटकथा संवाद लेखन
६) गुंठामंत्री (सिनेमाची कथा)
७) श्री भुलेश्वर माझे दैवत (माहिती पट गीतलेखन)
८) ढोलकीच्या तालावर (मराठी सिनेमा गीत लेखन)
९) गाव कवितेचा, कवि मुलांच्या भेटीला...उपक्रम सुरु केले

मिळालेले पुरस्कार व सन्मान

१) (युवा पत्रकार गौरव पुरस्कार  ( राज्य्स्तरीय २००० रोजी मा.कांशीराम यांच्या हस्ते प्रदान)
२) दलित मित्र पुरस्कार ( शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर .यांच्या हस्ते प्रदान)
३) महाराष्ट्र जीवन संघर्ष पुरस्कार
४) कविवर्य नारायण सुर्वे काव्य पुरस्कार (कामगार साहित्य परिषद)
५) बहुजन साहित्य रत्न पुरस्कार
६) सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार
७) प्रबुद्ध नायक पुरस्कार
८) सम्यक साहित्य संमेलन विशेष गौरव
९) संमेलनाध्यक्ष ः राज्यस्तरीय पहिले लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती

पदाधिकारी
१) अध्यक्ष -युथ प्रेस क्लब पुणे
२) सदस्य- श्रमिक पत्रकार संघ, पुणे
३) सदस्य -पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघ
४) उपाध्यक्ष - महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघ
५) संस्थापक अध्यक्ष- श्री भुलेश्वर ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था,माळशिरस
६) प्रमुख विश्वस्त - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
७) उपाध्यक्ष - महाराष्ट्र साहित्य परिषद, सासवड
८) सदस्य आचार्य अत्रे सार्वजनिक ग्रंथालय, सासवड
९) सदस्य श्री भुलेश्वर सार्वजनिक वाचनालय,माळशिरस
१०) संपादक - सा. आपला पुणेरी
११) संयोजक - महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन, खानवडी (ता.पुरंदर)
१२) संयोजक - छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन,सासवड
१३) संयोजन -लोकनेते शरदरावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती
१४) संयोजक- छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन, पुणे
१५) संयोजक - अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन
१६) संयोजक - आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन, सासवड                                        

Wednesday, September 18, 2013

हाय विठोबा..



कविता म्हणजे

कविता म्हणजे


कविता म्हणजे
शिवबाच्या तलवारीची
धार असते
अन्यायला भेदणा-या 
शूर मावळ्यांचा 
वार असते 

कविता म्हणजे
जिजाऊंच्या स्वप्नातील
स्वराज्याची हाय असते
छातीचा कोट करणा-या
मावळ्यांची माय असते

कविता म्हणजे 
तुकोबांच्या अंभगातील
सार असते
ज्ञानोबाच्या ओवीतील
दुधाची धार असते

दशरथ यादव, पुणे



पुरंदर

पुरंदर


क-हाकाठी मातीतून

घुमतो एक पुकार

मर्द मराठ्यांनी इथे

गाजवली तलवार


उसळून कोसळे वीर

मुरारबाजी हा थोर

कारकुड किल्लेदार

बेंगळे मानीना हार


किल्ल्यावर होते

मावळे चिमूटभर

ढासळले हे दगड

सपासप केले वार


ध़डाडून पडल्या तोफा

दिलेरखान झाला गार

हर हर गर्जनेने

शत्रू भेदला आरपार


अभेद्य होता पुरंदर

वज्रगड त्याच्या आड

शत्रू कापी चराचरा

मोगलांची मोडे खोड


शिवशाही बीज इथे

मातीत रुजली खोल

शंभू शिवाचा हा छावा

बोलतो बोबडे बोल


लढताना हो पडला

बाजी पासलकर

गरगरा फिरे पट्टा

गोदाजी करी कहर


दौलत मराठ्यांची

पानीपतात गेली

बेईज्जत महाराष्ट्राची

यो पेशवाईत झाली


कुंजीर कामठे माने

जाधवराव पोमण

जगताप खेडेकर

इंगळे काळे रोमण


५२ सरदार इथले

अटकेपार लावी झेंडे

पुढे जानोजी भिंताडा

लढे मानाजी पायगुडे


मातीला इथल्या येतो

गंध या इतिहासाचा

द-या खो-यातून घुमतो

आवाज शिवशाहीचा


क्रांतीवीर उमाजीनं

इंग्रज केला हैराण

या कडेकपारीतून

त्याचं उठवलं रान


बुलंद बाका पठारी

मंदिरे शिवाची सात

सात गडांचा पहारा

खडाच नऊ घाटात


भंडा-यात न्हाला गड

पैलतीरी भुलेश्वर

क-हा घेऊन कवेत

नांदतो पांडेश्वर


रामायण लिही वाल्ह्या

घडवून चमत्कार

म्हस्कोबा गुलालाने

रंगवितो गाव सारे


भिवरी बोपगावाला

कानिफनाथांचा वास

पोखर नारायणपूरला

दत्त मंदिरी आरास


मराठी पिळाची पगडी

गडकोट बहारदार

स्वाभिमानी हा बाणा

माझा जपतो पुरंदर


सोपानाने शेवटचा

श्वास इथेच घेतला



घे-यातल्या मावळ्यांनी

छातीचा केलाय कोट

चिव्हेवाडीनं धरलं

काळदरीचे हे बोट


पानमळा बागाईत

वीर परिंचे खो-यात

सीताफळ अंजिराने

गु-होळी राजेवाडीत


छत्रपती शिवाजींचा

उद्धार फुल्यांनी केला

कुळवाडी भुषण ऱाजा

सांगितला हो जगाला


बेलसर व नाझंर

क-हामाईची लेकर

दिवे,सोनोरी माहूर

गडाचे किल्लेदार


नीरा क-हेच्या खो-यात

असा इतिहास घङला

कुणब्यांनी इथल्या

दुष्काळ मातीत गाडला


पुरंदराच्या मातीत

निसर्गाची नवलाई

फळे फुले पालेभाज्या

इथे पिके आमराई


क-हाकाठाची मंदिरे

खुणावती पुन्हा मला

शिवशाहीचे तोरण

म्हणे बांधायचे तुला


पुरंदराच्या भूमीत

जन्म पुन्हा पुन्हा व्हावा

मातीने कणा कणात

इतिहास जागवावा


दशरथ यादव, पुणे


Tuesday, September 17, 2013

हाय विठोबा..
















हाय विठोबा..


कसली माळ कसला टाळ अजून होतो विटाळ
हाय..विठोबा सांगा कसं पेलायचे हे आभाळ

आल्या पिढ्या गेल्या कीती युगे झाली फार
मनुवाद्यांच्या मेंदूत अजून सुरुच आहे कुटाळ

कान्होपात्रा जनाबाई जात्यावर दुःख दळतात
भगवा ध्वज खांद्यावर तरी वारकरीच नाठाळ

कीर्तन, प्रवचन हरिपाठात बदल कराया हवा
मनू घुसल्याने वारीत परिवर्तन झाले भटाळ

नामा ज्ञाना तुकाचं खरं कुणी सांगत नाही
तेच देव त्याच कथा ऐकून झाल्यात रटाळ

वारीचा धंदा झालाय दिंडी म्हणजे मलिदा
चोर झालेत श्रीमंत गरीबांची होते आबाळ

नोट दाखवा बघा दर्शनाला नाही लागत वेळ
तूप लोणी खाऊन हा बडवा झालाया चाठाळ

दशरथ यादव, पुणे

साहेब




        साहेब

बांधावरच्या माणसाला आता
तुमच्यात देव दिसतोय
शेतीसाठी का व्हईना पण
तुमचाच जीव तुटतोय

गावातल्या सोनबाला बघा
तुमचं म्हणणं लय पटत
चार कोस सभा तरी
येतोना पाय आपटत

साहेब, शेतक-याच्या आत्महत्या
म्हणती साले फॅड झालया
मंदिर आणि मठांनी काय
समजाला कमी वेडे केलयं

रामाच्या नावावर जगणा-यांना
तुमची मोठी धास्ती आहे
सत्तेचं कुलूप खोलायला
त्यांच्याकडे कुठे चावी आहे

चुल आणि मुला पुरतीच
महिला आता सरपंच केलीत
महापौर, आमदारही झाली
सगळी पदे

महिलांसाठी तुम्ही मोठं
बघा काम केलंया
संस्कृती साखळदंड तोडून
त्यांच्या हातांना बळ दिलंया

शिवबाचा शिवधर्म आता
तुम्हाला सांगावा लागेल
कृष्णाजी भास्कर सारखा
मनूवाद फाडावाच लागेल

फुले शाहु आंबेडकरांचा
महाराष्ट्र तुम्ही फुलवलाय
शिवरायांचा राष्ट्रवाद
मनामनात जागवलाय

कोण परदेशी कोण स्वदेशी
आता हेच ठरवावे लागेल
साहेब तुम्हालाही आता
मनातले बोलावेच लागेल

बारामतीच्या वैभवाने
मनुवाद्यांचे डोळे दिपतात
अंधा-या खोलीत जाऊन
काजव्या समोर बसतात

दशरथ यादव, पुणे

Monday, September 16, 2013

कळू लागले कविता

 कळू लागले


निसटलेले दिवस आता छळू लागले
जीवन माझे मला आता कळू लागले

थकून गेल्या बघा या जुनाट वाटा
पाय पुन्हा घरांकडे वळू लागले

खरेपणाने वागलो, डाग ना लागला कधी
शुभ्र कपडयातले मन आता मळू लागले

पावसाळा कोरडा गेला, शेती ओसाडली
कडक उन्हाळ्यात, आभाळ गळू लागले

उमगले मला जेव्हा, महत्व आयु्ष्याचे
वय दिवसाच्या मागे बघा पळू लागले

कित्येक मैल आता बालपण राहिले दूर
वार्धक्य खुणावताना तारुण्य चळू लागले

पेटते निखारे घेउन संकटे पचवली किती
हिरव्यागर्द मनाचे आतून पानही गळू लागले

निवडणूक अशी लढलो शत्रू भेदला आरपार
जिंकण्याच्यावेळी नेमकेच यार पळू लागले

दशरथ यादव, पुणे

Wednesday, September 11, 2013

यादवकालीन भुलेश्रवर प्रकाशन







Saturday, September 7, 2013

दशरथ

~m`moS>mQ>m
Zmd … XeaW amOmam_ `mXd 
nÎmm … ^oH$amB©ZJa nmo. \$wagw§Jr Vm. hdobr {O. nwUo
H$m`_Mm nÎmm … _mi{eag, Vm. nwa§Xa, {Oëhm nwUo
_mo~mB©b Z. 9881089481 
{ejU … Eम.E. ~r.Oo.
OÝ_VmarI … 8-10-1970
ì`dgm` … nÌH$m[aVm d  gm{hË`boIZ 
N>§X … gm{hË`boIZ, dmMZ, ZmQ>H$, dº$¥Ëd, à~moYZ, A{^Z`, g_mOgodm, H$~È>r, Imo Imo, VgoM n`©Q>Z, B{Vhmg g§emoYZ, {H$„o g§emoYZ, n`m©daU, {ZgJ©mV {\$aUo.
nÌH$m[aVoMm AZw^d … 
1)1989 gmbr gm. g§J_oída, _m{gHo$, {Xdmir A§H$mVyZ boIZmbm gwadmV.
2)1990 amoOr X¡{ZH$ gm§O g_mMma_Ü`o H$m_mbm gwadmV.
13)991Vo1994 Xaå`mZ X¡{ZH$ nwT>mar nwUo Amd¥VrMr O~m~Xmar. nwUo ehamV nÌH$m[aVobm gwadmV H$aVmZm nwUo _Znm, qnnar _Znm, nwUo {dÚmnrR>, Ý`m`mb`, H«$mB©_, {Oëhm n[afX, gm§ñH¥${VH$ H$m`©H«$_mMo dmVm©H§$Z, VgoM nwÊ`ZJar, Aerhr nwÊ`ZJar `m gXamVyZ Mm¡\o$a boIZ,
X¡{ZH$ nwT>marV nwUoXe©Z ho nwÊ`mMr gm§ñH¥${VH$ dmQ>Mmb eãXãY H$aUmao gXa JmObo.
  4)1994 amoOr B§J«Or d _amR>r ^mfoVyZ à{gÕ hmoUmè`m nwUo {Q>«ã`yyZ `m d¥ÎmnÌmV nÌH$m[aVm Ho$br.
5)1995 n`ªV X¡{ZH$ Ho$garV ~mV_rXma åhUyZ H$m_mbm gwadmV. nwUo ehamÀ`m dmT>Ë`m CnZJam{df`r Mm¡\o$a boIZ.
6)1995Vo 2002 `m gmbr X¡{ZH$ gH$mi_Ü`o gmgdड बातमीदार म्हणून काम.                                                                                                                                                                                                    gm{hpË`H$ CnH«$_

1) A{Ib ^maVr` Zdmo{XV _amR>r gm{hË` g§_obZ Jobr AR>am df} gwé Amho.

2) amÁ`ñVar` _hmË_m \w$bo _amR>r gm{h` g§_obZ(VrZ df}, ImZdS>r Vm.nwa§Xa).
3) amÁ`ñVar` N>ÌnVr g§^mOr _hmamO gm{hË` g§_obZ (Xmo df},gmgdS>Vm. nwa§Xa)
4)AmMm`© AÌo _amR>r gm{hË` g§_obZ,gmgdS> (Jobr n§Yam df} gwé Amho.)
5) J«m_rU _amR>r gm{hË` g§_obZ, nmaZoa Vm. ZJa
6)n[adV©Z gm{hË` g§_obZ, nbwg {O.gm§Jbr.
7)amÁ`ñVar` bmoH$H$bm gm{hË` g§_obZ OoOwar.
8)H${d _wbm§À`m ^oQ>rbm...H${dg§_obZmMm CnH«$_ amÁ`^a gwê$ Amho. amÁ`mVrb XrS> bmI _wbm§n`ªV CnH«$_ nmoMdbm.
9)Jmd H${dVoMm..H${dg§_obZmMm H$m`©H«$_.
10)à~moYZ H${dg§_obZ eoH$S>mo H$m`©H«$_.
11)_mUgm§Mo A§Va§J...eoH$S>mo ì`m»`mZo..
12) gË`emoYH$ {XZH$aamd OdiH$a O`§VrMr 80dfm©Z§Va gwadmV Ho$br.

{_imbobo nwañH$ma

—————
1) amÁ`ñVar` `wdm Jm¡ad nwañH$ma àXmZ 2000 amoOr ~gnmMo g§ñWmnH$ _m. H$m§eram_ `m§À`m hñVo.
2) X{bV {_Ì nwañH$ma hñVo àXmZ {edlr nwéfmoÎm_ IoS>oH$a
3) OrdZ g§Kf© nwañH$ma 
4) H$m_Jma gm{hË` n[afXoMm Zmam`U gwd} nwañH$ma H${dVm boIZm~Ôb.
5)~hþOZ gm{hË` aËZ nwañH$ma..à~moYZ MidirVrb H$m`m©~Ôb.
6)gË`emoYH$ {XZH$aamd OdiH$a nwañH$ma
7)gå`H$ gm{hË` g§_obZmV {deof Jm¡ad
8)à~wXY Zm`H$ nwañH$ma..S>m.~m~mgmho~ Am§~oS>H$a {dMma _§MmV\}$.
9) संमेलनाध्यक्ष राज्यस्तरीय लोकनेते शदररावजी पवार कृषी साहित्य संमेलन, बारामती



gm{hË` boIZ

-------------------———
1) `mXdH$mbrZ ^wboída — ho_mS>n§Wr {eënH$boMm g§emoYZmË_H$ Eo{Vhm{gH$ g§emoYZ H$éZ {b{hbobo nwñVH$.
2)CÝhmVbmS>  ~mV_rXma åhUyZ H$m_mbm gwadmV. Xaå`mZÀ`m H$mimV J«m_rU ^mJmVrb g_ñ`m _m§Sy>Z gmoS>{dÊ`mMm à`ËZ.
7) nwa§Xa VmbwŠ`mV gH$miMm ~mV_rXma åhUyZ {dnwb boIZ. emoYnÌH$m[aVo_wio amÁ`^a H$m¡VwH$.
8) 1995 gmbr n{hë`m§Xm X¡{ZH$ gH$mi_YyZ Ami§Xr Vo n§T>anya nm`r dmarMo dmarÀ`m  dmQ>oda `m gXamVyZ X¡Z§{XZ dmVmªH$Z. dmarÀ`m  dmQ>oda `m boIZmbm A{Ib _amR>r OJVmMr bmoH$_mÝ`Vm. ho dmVmªH$Z Iyn bmoH${à` R>abo. b{bV boIZmÀ`m A§JmZo OmUmè`m ‘m boIZmMo dmMH$m§Zr A_mn H$m¡VwH$ Ho$bo.
dmarÀ`m dmQ>oda nm`r MmbyZ dmVmªH$ZmMr n{hb nmD$g H${dVmg§J«h
3)gË`emoYH$ {XZH$aamd OdiH$a
4)dmarÀ`m dmQ>oda (ghmeo nmZmMr _hmH$m§X~ar)
5) dmarMo I§S>H$mì`
6)dmarMo A§^J
7){edY_©JmWm (nmMhOma A§^JmMm gh^mJ)
8)Jw§R>m_§Ìr H$Wm, ZmQ>H$
9)aUm§JU  `m _amR>r {MÌnQ>mMr nQ>H$Wm d g§dmX boIZ
10) nwa§XaMm B{Vhmg
11)nwéfmoÎm_mMm nmodmS>m
12)JmUr eaX ndmam§Mr
13)H$Wm g§J«h
14)Kw§JwaH$Wm
15)nmonamdm§Mr {dH$mgJmWm
16)H$mQ>odmS>r `emoJmWm
17) boIUrMr \w$bo H${dVmg§J«hmV VrZ H${dVm§Mm g_mdoe
18) àJVr (gH$mi_Yrb eoVr{df`H$ boImÀ`m nwñVH$mMr g§H$ënZm d g§nmXZ)
   gwadmV d¥ÎmnÌjoÌmV Pmbr. `mMm amÁ`^a bmoH${à`Vm {_iyZ H$m¡VwH$mMr nmR>rda Wmn nS>br.  
१9) JmdmMo {MÌ hr J«m_rU ^mJmVrb JmdmMo JmdnU OnUmè`m _m{bHo$bm _moR>r à{gÔr. ho gXa bmoH${à` R>abo.
10) nwa§Xa Cngm qgMZ `moOZm (VrZeo H$moQ>r én`o IMm©Mr) _mJu bmdÊ`mV _moR>m gh^mJ. Mmirg hOma EH$ambm nmUr {_imbo. hm gJù`mV nÌH$m[aVoMm _moR>m AmZ§X.
11) ~mV_rXmarÀ`m Omoamda Aï>mnya `oWrb _wim_wR>m ZXrdarb nwbmMo H$m_ _mJu bmdÊ‘mV _moR>m gh^mJ.
12) amOodmS>r d JwèhmoirÀ`m A§OramMm {df`  Xoe^a nmoMdyZ eoVH$è`m§Zm Ë`mMmC 
Am{S>Amo d pìhS>rAmo
1) qXS>r {ZKmbr n§T>arbm (_amR>r {gZo_m) dmarÀ`m dmQ>oda _hmH$m§X~arda AmYm[aV
2) _{h_m ^wboídamMm ( Aë~_)
3)gË`mMr dmar (pìhS>rAmo _m{hVrnQ>mMo boIZ)
4)^º$sgmJa (g§V kmZoída nmbIr gmohù`mda AmYm[aV _m{hVrnQ>mMo boIZ)
5)aUm§JU (_amR>r {gZo_mMo nQ>H$Wm d g§dmX boIZ d A{^Z`)
6)Jw§R>m_§Ìr, Mm¡\w$bm bmdUrbm emgZmMm nwañH$ma
7)Jw§R>m_§Ìr ({gZo_mMr H$Wm boIZ)
8)bmdUr d H${dVoMr Ow§Jb§~§Xr (amÁ`mVrb n{hbm H$m`©H«$_ Ho$bm)
9)nwUo AmH$medmUr H|$Ðmda H${dg§_obZmV gh^mJ d {ZdoXZ 1992 amoOr)
10)r ^wboída _mPo X¡dV _m{hVrnQ>mgmR>r JrV boIZ
11) Jw§R>m_§Ìr, Mm¡\w$bm bmdUr AH$byO bmdUr _hmoËgd d amÁ`gaH$maÀ`m _hmoËgdmV gmXa.
12)
-------------------
----------------------
gm{hË`, bmoH$H$bm, hmñ` _Zmoa§OZmVyZ ì`{º$_Ëd {dH$mg
^maV hm H¥$frg§ñH$¥VrVyZ KS>bobm Xoe Amho. Xoe eham~amo~aM Iè`m AWm©Zo IoS>çm nmS>çmV {dIwabobm AgyZ, _m{hVr V§ÌkmZmMm PnmQ>çmZo {dH$mg Pmë`mZo AmVm ehamà_mUo IoS>çmVhr kmZmMr H$dmS>o CKS>br AmhoV. nma§nm[aH$Vm OVZ H$aVmZm Zì`m g§emoYZmMm ñdrH$ma H$ê$Z AmH$membm JdgUr Kmbm`Mr _moR>m \$m`Xm. IoS>çmMo Iè`m AWm©Zo Xe©Z XoUmè`m ~mVå`m§_wio J«m_rU ^mJmVrb nÌH$m[aVoMm nm`m KmVbm.
13) ÁdmarÀ`m H$UgmV MrH$.^abm AZ« hþaS>m nmQ>çm© a§JmV Amë`m... Aem bjdoYr eoVr_mVr_Yrb ~mVå`m§Zr {df`m§H$S>o bj doYyZ KoVbo.
14)dmQ>mUm, Ádmar, ~mOar, nwa§Xa {H$„m, OoOwar, dra, YaUo, Jw§OdUr, gmgdS> ZJanmnm{bH$m, H$èhm ZXr, ZmPao YaU, {XdoKmQ>, ^wboída, nm§S>oída, g§J_oída, nmZdS>r, Koam nwa§Xa, XodS>r, `m gJù`m n«H$maÀ`m dmVmªH$ZmZo Zdr {Xem {Xbr.
15) H$èhmH$mR>mda AmMm`© AÌo `m§Mo ñ_maH$ ìhmdo åhUyZ, nmR>                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                nwamdm H$ê$Z H$m_ _mJu bmdbo.
16) gmgdS>bm nmUr nwadR>m H$aUmè`m JamS>o YaUmMr C§Mr Am{U XwéñVrÀ`m H$m_mV ghH$m`©.
17)KmoadS>rMo nmUr gmgdS>bm XoÊ`mgmR>r AmdmO CR>dbm.
18)nwa§XaÀ`m n`©Q>ZmH$S>o n`©Q>H$m§Mo bj doYyZ KoVbo.
19) Zmam`Unya, Ho$VH$mdio, OoOwar, ^wboída, nm§S>oída, n`©Q>ZñWimMm XOm©~m~V _mJUr.
20) gmgdS>bm nrE_Q>r ~g gwé Ho$br. hOmamo bmoH$m§Mr gmo` Pmbr.
21) g§V gmonmZXod n[agambm n`©Q>ZmMm XOm© XoÊ`mgmR>r gmVË`mZo boIZ Ho$bo.Ë`mMm Cn`moJ Pmbm.
-------------------------
1) g§nmXH$ … Amnbm nwUoar `m gmám{hH$mMo H$m_ Ho$bo. 1995 amoOr {edemhra ~m~mgmho~ nwa§Xao, àmMm`© {edmOramd ^mogbo, {H$aU R>mHy$a, {dO` H$mobVo `m§À`m CnpñWV àH$meZ Ho$bo. nwUoar gmám{hH$mVyZ AZoH$ g_ñ`m _m§Sy>Z Ë`m§Zm dmMm \$moS>br.
2)2002 amoOr X¡{ZH$ bmoH$_V_Ü`o nwÊ`mV ~mV_rXma åhUyZ H$m_mbm gwadmV. bmoH$_VgmR>r 1 df} dmarÀ`m dmQ>oda `m gXamVyZ boIZ Ho$bo.
3) CnZJamVrb PmonS>nÅ>rÀ`m g_ñ`m _m§S>Umao gXa {b{hbo. am_dmS>r, H$mgodmS>r, `oadS>m, dmaOo_midmS>r, hS>nga, Ho$iodmS>r `m gd©M PmonS>nÅ>m`m§_Yrb boIZ {deof JmObo. bmoH$m§Zmhr g_ñ`m gmoS>{dÊ`mV Ë`mMm Cn`moJ Pmbm.
4) nwUo ehamVrb JUoímomËgd _§S>im§Zm ^oQ>r XodyZ gm§ñH¥${VH$ boIZ Ho$bo.
5)í`m_Mr AmB© dZ_mbm `m§À`mdarb dmVmªH$Zmbm _moR>r à{gÕr {_imbr.
6) í`m_ H¥$Vk {ZKmë`mMr AmB©Mr VH«$ma `m ~mV_rZo dmVmdaU T>diyZ {ZKmbo.
7){X„rVrb N>ÌnVr {edmOr _hmamOm§À`m ñ_maH$m~m~VMr _m{bH$m {deof JmObr.
8) hS>nga ½bmBª{S>J g|Q>a, n§Yam Z§. hS>nga, \w$agw§Jr nwbmMm nmR>nwamdm H$aUmè`m VgoM H$MamS>onmo~m~VÀ`m ~mVå`m§Zr Y_mb Ho$br.
8)2003 Vo 2004 Xaå`mZ X¡{ZH$ nwT>marV Xwgè`m§Xm d[að> ~mV_rXma åhUyZ nwÝhm H$m_mbm gwadmV. Xaå`mZ dmarÀ`m dmQ>odaMo dmVmªH$Z VgoM Am¡a§Jm~mX `oWrb A{Ib ^maVr` _amR>r gm{hË` g§_obZmMo dmVmªH$Z Ho$bo.
9) 2004Vo 2005 n`§ªV  X¡{ZH$ gwamÁ` gmR>r _w»`dmVm©ha åhUyZ H$m_mbm gwadmV. AmO {XZm§H$ `m gXamVyZ g_ñ`m§da ~moQ> R>odUmao boIZ Ho$bo. am`JS> da g§^mOr {~JoS>À`m N>mì`m§Zr {edmOr _hmamOm§Mm amVmoamV nwVim ~gdyZ gaH$mabm Ymaoda Yabo. hm {df` b{bV A§JmZo {bhÿZ Ho$bobo dmVmªH$Z {deof JmObo.
10) nwUo ehamd T>J\w$Q>r, Aem XaamoO AZoH$ ~mVå`m {Xë`m.
1) 2005 amoOr _w§~B© `oWrb X¡{ZH$ Zdeº$sMm nwUo ~mV_rXma åhUyZ H$m_mbm gwadmV Ho$br. 
2) nwÊ`mÀ`m _hËdnyU© AZoH$ ~mVå`m {Xë`m. Xaå`mZ dmarÀ`m dmQ>oda `m gXamMo EH$ dfm©Mo boIZ Ho$bo. nmZrnVmV _amR>çm§Mm nam^d Pmbm. Ë`mdoir MwH$boë`m _amR>çm§Mr amoS> _amR>m hr OmV h[a`mZm, H$aUmb,nm{ZnV `oWo Amho. Ë`mMm Aä`mg H$ê$Z gXa {b{hbo.
3)2006 amoOr nwÝhm gH$mi_Ü`o Xwgè`m§Xm Cng§nmXH$ åhUyZ H$m_mbm gwadmV. àma§^r qnnar qMMdS> Amd¥VrMr O~m~Xmar gm§^mibr.  
4)qnnar n[agamMo ~XbVo eha hr AmoiI H$aUmar Jmdo H$er ~Xbbr hr _m{bH$m MmbdyZ OwÝ`m AmR>dUtZm COmim {Xbm.
Xaå`mZ gH$miÀ`m {Oëhm Amd¥VrMm Mma df} H$ma^ma gm§^mibm.
5) gH$miMr eoVr {df`H$ àJVr hr nwadUr gm§^mibr. AmYw{ZH$ eoVrMo kmZ XoUmè`m nwadUrVrb boIm§Mo nwñVH$ àH$m{eV Ho$bo. gH$mi_YyZ {ejH$ ~Zbo nwT>mar, ~XbË`m OÌm, añË`mdaMo Am`wî` Aer JmObobr gXao Mmbdbr. {^a{^a§ ho MmaAmoir H${dVoMo gXa Mmb[dbo. Vo {deof bmoH${à` R>abo.
6)  {Oëh`mVrb Voam VmbwŠ`mVrb 80 ~mV_rXmam§er g§nH©$ gmYyZ Amd¥Vrb bmoH$ H$aÊ`mV _mobmMm dmQ>m CMbbm.
7) `wW àog Šb~À`m nÌH$ma Xm¡è`mV {X„r, n§Om~, h[a`mZm, n[agam§Zm ^oQ>r.

g§ñWmMo nXm{YH$mar

1) AÜ`j -                  `wW àog Šb~ nwUo.
2)gXñ` -                   l{_H$ nÌH$ma g§K nwUo.
3)gXñ` -                   nwUo {Oëhm _amR>r nÌH$ma g§K, _hmamï > amÁ`.
4)g§ñWmnH$ AÜ`j -  lr ^wboída J«m_rU {~Ja eoVr gh. nVg§ñWm.
5)à_wI {dídñV-      A{Ib ^maVr` _amR>r gm{hË` n[afX.
6) CnmÜ`j-             _hmamï > gm{hË` n[afX, gmgdS>
7)gXñ` -                AmMm`© AÌo gmd©O{ZH$ J«§Wmb`, gmgdS>
8)gXñ` -                lr ^wboída gmd©O{ZH$ dmMZmb`,_mi{eag
9) g§ñWmnH$ -           _hmamï > amÁ` nmbIr gmohim nÌH$ma g§K.
10) gXñ` -               lr ^wboída godm Q >ñQ>, _mi{eag.